मुंबई : मुंबईत पावसाची जोरदार धार कोसळत आहे. यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुंबईची “तुंबई” झाली असून, यामुळे मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे दरम्यान, मुंबईमध्ये पावसाचे पाणी परत तुंबल्याने, मुंबई महापालिकेत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेवर भाजपने हल्लबोल केला होता.
यातच, मालाड प. मालवणी भागात, गेट न. ८ इथे अब्दुल हमीद मार्गावरील ‘न्यू’ कलेक्टर कंपाऊंड भागात बुधवारी रात्री ११ च्या सुमारास इमारत अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. यात ११ जणांचा मृत्यू झाला असून, यात ७ लोक जखमी लोकांना बीडीबीए रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावरून शिवसेना आणि आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली जात असून, मनसेने देखील यात उडी घेतली आहे.
मनसेने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील २० पेक्षा जास्त मॅनहोल्स उघडे असल्याचं समोर आणलं असून, या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘पर्यावरण मंत्र्यांच्या मतदारसंघात अशी अवस्था असेल, तर मुंबई शहराचं काय,’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे,
तसेच, ‘महापौर फक्त दावा करतात, पण मुंबई शहरातील किती मॅनहोल्स सुरक्षित आहेत, ते त्यांनी एकदा तपासावं. शिवसेनेच्या आमदारांनी इथून एक राऊंड मारावा. महापौर लोकांचे बाप काढत आहेत. त्यामुळे त्यांनी आता जास्त शहाणपणा शिकवू नये,’ असा अप्रत्यक्षपणे थेट इशाराच त्यांनी महापौरांना दिला आहे.
Read Also :
- ‘त्यांचं माहिती नाही पण आम्ही मात्र निवडणूका स्वतंत्रपणे लढवणार’ – नाना पटोले
- राष्ट्रवादी-शिवसेनेच्या युतीचे भाकीत करून पवारांनी काँग्रेसला धमकी दिली – नारायण राणे
- ‘हे सरकार पहाटेच्या अंधारात झालेलं नाही, उघडपणे शपथविधी घेणारं हे सरकार आहे.’
- का भेटले प्रशांत किशोर शरद पवारांना? अजित पवारांनी केला खुलासा
- ‘शरद पवार पंतप्रधान झाल्यास आनंदच’ – शिवसेना