खेड | प्रतिनिधी भारत हा युवकांचा देश आहे. युवक हा या देशाचे भविष्य आहे. युवकांमध्ये देशाचे चित्र आणि समाजाची प्रगती करण्याची क्षमता आहे. किंबहुना क्रांती घडवण्याचे सामर्थ्य आहे. अशा ध्येय वेड्या युवकांच्या साथीने खेड-आळंदी विधानसभा मतदार संघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावून लोकाभिमुख कारभार करण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे आम्ही आप युवा संवाद मेळाव्याचे आयोजन केलं असल्याचं मत खेड आळंदी विधानसभा आप युवा आघाडीचे अध्यक्ष मयुर दौंडकर यांनी सांगितले आहे. आज चाकण याठिकाणी आप युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आपचे प्रदेश अध्यक्ष रंगा राचुरे, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य शिंदे, राज्य संघटक, संदीप सोनवणे, पुणे संयोजक मुकूंद किर्दत यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
“शिवसेना फुटण्यापेक्षा जास्त वाढली..!” संत सेवालाल महाराजांचे पाचवे वंशज ठाकरे गटात
आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि देशाची राजधानी दिल्लीचे यशस्वी मुख्यमंत्री अरविंदजी केजरीवाल यांच्या नेतृत्त्वाखाली काम करीत असल्याचा आम्हा युवकांना अभिमान वाटतो. हा देश बदलला पाहिजे. ही व्यवस्था सुधारली पाहिजे आणि समाजाची उन्नती झाली पाहिजे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठीच आणि लोकांनी समस्या मांडण्याच्या हेतूने आम्ही ‘‘युवा संवाद’’ हा कार्यक्रम नियोजित केला. असल्याचंही त्यांनी सांगितले.
“आता एकत्र आलं पाहिजे, कारण मिधें सरकार खुर्चीसाठी दिल्लीश्वरांचे पाय चाटताहेत”; उद्धव ठाकरे
त्याचबरोबर पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही या मतदार संघातील युवकांनी या संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. हा या मतदार संघातील राजकीय पटलावरील प्रस्थापितांची झोप उडवणारा ठरणार आहे. मतदार संघातील खेड्यापांड्यांमध्ये स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा करणे, आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणणे, स्थानिक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करणे, वाहतूक व्यवस्था सक्षम करुन दळणवळण सुधारणे, विविध प्रकल्पांमुळे बाधीत झालेल्या भूमिपुत्रांना न्याय मिळवून देणे, एमआयडीसीतील कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारणे, सार्वजनिक शिक्षण आणि आरोग्य सुविधांवर भर देणे, इंद्रायणी नदी स्वच्छतेसह पर्यावरण संवर्धन आणि तीर्थक्षेत्र विकासासाठी विकास आराखडा तयार करणे, यासह खेड, चाकण आणि आळंदी नगरपरिषदेतील कारभार गतीमान आणि पारदर्शी करुन लोकांना चांगल्या सोयी-सुविधा देणे यासाठी पुढील काळात युवकांची फौज उभा करुन आम आदमी पार्टीद्वारे मतदार संघ विकासाचे ‘रोल मॉडेल’ करण्यासाठी आम्ही काम करणार असल्याचंही मुयर दौंडकर यांनी सांगितले आहे.
“सावध रहा, त्या बुरसट रूढींना पुन्हा परत आणण्याचा काही प्रवृत्ती प्रयत्न करताहेत”; जंयत पाटील
दरम्यान, देशाची राजधानी दिल्ली, पंजाब आणि गोवा राज्यात आम आदमी पार्टीला सर्वसामान्य लोकांनी स्वीकारले. राष्ट्रीय नेते अरविंद केजरीवाल यांच्या विचारावर विश्वास ठेवून नागरिक आम आदमी पार्टीकडे प्रस्थापित राजकीय व्यवस्थेपुढे सक्षम पर्याय म्हणून पाहात आहेत. आगामी काळात खेड-आळंदी विधानसभा मतदार संघात ‘आप’च्या माध्यमातून युवकांच्या साथीने विकासाचे नवे चित्र पहायला मिळेल, असा विश्वास व्यक्त देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Read also
- “गडकरींनी गोपीनाथ मुंडेंना जसं ट्रॅपमध्ये अडकवलं, तसेच फडणवीस पंकजा मुंडेंना..” अंधारेंचा गंभीर आरोप
- “शेजारच्या मंत्र्यांनी दम दिला, लगेच दौरे रद्द..! इतकी लाचारी का आणि कोणासाठी?” राष्ट्रवादीचा सवाल
- “मोदी सत्तेत आल्यानंतर देशात अंधार झाला”; युवा संवाद कार्यक्रमात ‘आप’चा मोदींवर हल्लाबोल
- अजब प्रेम की गजब काहाणी.! 2 जुळ्या बहिणींनी एका तरूणासोबत लग्न केल्याने गुन्हा दाखल..! महिला आयोग चौकशी होणार?
- “आमच्याकडे एक सुशी ताई, पण वरच्या मजल्यावर घनदाट अंधार”; मनसेची खोचक टिका