मुंबई: राज्यात कोरोना संसर्ग थोडा कमी झाल आहे, परंतू अद्याप राज्यावरील कोरोनाचे संकट पूर्ण पण गेले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या तिसऱ्या लाटे बद्दल सुद्धा कल्पना दिलेली आहे. कधि तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने, सामाजिक, राजकीय कार्यक्रमाला राज्य सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे.
हे पण वाचा: संजय राऊतांची भाजपवर बोचरी टीका, शिवसेना खासदार ११ मागण्यांचं निवेदन घेऊन पंतप्रधानांना भेटणार
राज्यात कडक निर्बध असताना तरी सुद्धा राजकीय पक्षाकडून आंदोलने राजकीय क्रार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे. या सर्व राजकीय नेत्यांवर गृहखात्याकडून कारवाई करण्यात आली आहे. परंतू राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसाठी वेगळा नियम लावण्यात आला आहे का अस सवाल विरोधकांनी उपस्थीत केला आहे. गृहखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यावर कारवाई होत नाही.
हे पण वाचा: ‘आलं अंगावर की ढकल भाजपवर हीच संजय राऊतांची भूमिका’
राष्ट्रावादी नेत्यावर गृहखाते मेहबान आहे का?
राजकीय कार्यक्रमाला गर्दी सर्वच पक्षाकडून होत आहे, आणि त्यांना कारवाईला सुद्धा समोरे जावे लागले आहे, मग महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाच्या प्रणिती शिंदे यांनी आताच केंद्र सरकारच्या विरोधात सोलापूर येथे आंदोलन केले होते. कोरोनाचे नियम भंग केल्या प्रकरणी त्यांच्या कार्यकत्या समोबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र राष्ट्रावदी नेत्यासाठी वेगळी न्याय का? राष्ट्रवादीच्या नेत्यावर गुन्हा दाखल नाही होत, तर आयोजकावर होते, राष्ट्रावादीकडे गृहखाते असल्यामुळे त्यांच्यावर गृहखाते मेहबान आहे का? असा सवाल विरोधकांनी केला आहे.
हे पण वाचा: संजय राऊतांची ही सवयच, “आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून”
आव्हाड यांना सरकार पाठीशी घालत असल्याचा भाजपचा आरोप
दरम्यान, कोरोनाचे नियम डावलून आरती करणाऱ्या मंत्री जितेंद्र आव्हाड यांना सरकार पाठीशी घालत असून, त्यांच्या कार्यकर्त्यांचा बळी दिला जात असल्याचा आरोप भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केलाय. नाशिकच्या गंगापूर पोलिसांनी आव्हाड यांच्यासोबत आलेल्या पाच कार्यकर्त्यांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम २६९, २७०, १८८ या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, लवकरच त्यांना अटक केली जाणार आहे, असं पोलिसांनी स्पष्ट केलंय. मात्र आव्हाडांच्या कृत्याची शिक्षा कार्यकर्त्यांना देऊन एक प्रकारे सरकारने आव्हाडांना अभय दिल्याची चर्चा आहे.
हे पण वाचा: “संजय राऊत यांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज..”
मग इतर पक्षातील नेत्यांसाठी वेगळा न्याय का?
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मुंबई येथे शक्ती प्रदर्शन आंदोलन केले तेव्हा त्यांच्यासह ४२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मराठा आरक्षणा संदर्भात बीडमध्ये शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी आंदोलन केले तेव्हा सुद्धा त्यांच्यासह त्यांच्या कार्यकत्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. सोलापूरमध्ये सुद्धा असेच झाले माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात मराठा मोर्चा निघाला तेव्हा सुद्धा भाजपाच्या दोन खासदार, सात आमदार, सोलापूरच्या महापौर, यांच्यासह ४६ जणावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यावर कारवाई नाही, तर आयोजकावर फक्त कारवाई होते. इतर पक्षासाठी वेगळा नियम का असा सवाल राजकीय पक्षाकडून उपस्थीत केला जात आहे.
Read Also :
- संजय राऊतांची भाजपवर बोचरी टीका, शिवसेना खासदार ११ मागण्यांचं निवेदन घेऊन पंतप्रधानांना भेटणार
- उपमुख्यमंत्र्यांनंतर ‘अनलॉक’ बाबत राजेश टोपेंचेही सूचक विधान!
- फडणवीसांना माझे नेते मानण्याचा विषयच नाही कारण…पंकजा मुंडेंचे पुन्हा स्पष्टीकरण
- जे केंद्राने सांगितले तेच ठाकरे सरकारनेही केले आहे, “संजय राऊतजी, तुम्हालाच नाही, तर आम्हालाही धक्का बसलाय!”
- जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करा! भाजपची आक्रमक मागणी