शेतीचे आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असून, सर्वसामान्य शेतकऱ्यांना, शेतीला प्रतिष्ठा मिळवून द्यायची आहे, असा विश्वास राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला आहे. ते एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.
सोयबीन बियाणांच्या तक्रारीवरून शेतकऱ्यांमध्ये राग होता. याविषयी बोलताना दादाजी भुसे म्हणाले की, सोयबीनच्या बियाण्यांबद्दल तक्रारी आल्या. 75-80 टक्के छाननी पूर्ण झाली असून ज्या कंपन्या दोषी आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. महाबीज हे कृषी विभागाचंच महामंडळ आहे. बियाण्यांमध्ये दोष असेल तर रिप्लेस करुन देण्याची सूचना दिली होती. शिवाय रक्कमही देण्यास सांगितलं होते.
शेतकऱ्यांना विविध माध्यमातून मदत केली जात असल्याचे देखील त्यांनी सांगितले. महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचा उल्लेख करत ते म्हणाले की, डिसेंबरमध्ये मुख्यमंत्र्यांनी ही योजना जाहीर करण्यात आली असून, यातून जवळपास 30 लाख शेतकऱ्यांना मदत झाली आहे.