सोलापूर: उजनी धरणाच्या पाण्यावरून सोलापूर जिल्ह्याचे राजकारण चांगलेच तापले होते. उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील २२ गावांना देण्याचा सर्वेक्षणाचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला होता. यावरून सोलापूर जिल्ह्यातील नेते ,उजनी धरण बचाव संघर्ष समितीने या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला होता. वाढणाऱ्या विरोधामुळे आणि आंदोलनांमुळे अखेर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मीडियासमोर येत हा आदेश रद्द केला. तरी देखील लेखी आदेश मिळावा म्हणून आंदोलने करण्यात होती.
हे पण वाचा, राज्यमंत्री, आमदारकीचा राजीमचाच नव्हे तर राजकीय संन्यास घेईल – पालकमंत्री दत्तात्रय भरणे
हे पण वाचा, उजनीच्या पाणीप्रश्नी सोलापूर जिंकले; इंदापूर हरले
राजकारणात आरोप प्रत्यारोप हे चालूच असतात. जे काम करत नाही त्यांच्यावर टीका झाल्यास वाईट वाटून घेण्याचे काही कारण नसते मात्र मी सोलापूर जिल्ह्यासाठी खूप कष्ट घेतले. विविध योजना मंजूर करून घेण्यासाठी शासन दरबारी योग्य तो पाठपुरावा केला. मात्र जिल्ह्यासाठी काम करूनही लोक प्रतिनिधी माझ्या विरोधात गेले. माझ्यावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली आणि या टीकांमुळे मला नक्कीच वेदना झालेल्या आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद नकोच अशी भावना माझी असल्याचे पालकमंत्री दत्ता भरणे यांनी स्पष्ठ केले आहे.
हे पण वाचा, प्रणिती शिंदे झाल्या आक्रमक, उजनीच्या पाण्यावरून आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे
हे पण वाचा, “उरलीसुरली राष्ट्रवादी काँग्रेस, आता उजनीच्या पाणी प्रश्नावरून धुळीला मिळेल” आमदार प्रशांत परिचारिक
कोरोना स्थितीचा व विकास योजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री भरणे सोलापुरात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. कोरोना लसीकरण आणि रेमेडीसीवरचा संपूर्ण राज्यात तुटवडा असताना लोकांनी फक्त सोलापूर सोलापूर केले. कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये मी आणि प्रशासनाने चांगले काम केले. बैठका घेतल्या. इतर जिल्ह्यातील पालकमंत्री तालुक्यांमध्ये होते के नाही ते एकदा बघाच असे देखील ते यावेळी म्हटले. भरणेंच्या विरोधात जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आणि भरणेंच्या विरोधात तक्रारींचा पाढाच वाचला यामुळे नाराज भरणे यांनी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.
हे पण वाचा,
उजनीच्या पाणी प्रश्नी महिला हातात लाटणे घेऊन पालकमंत्र्यांना जाब विचारणार
उजनीच्या पाण्याचा आदेश रद्द करण्याचा राज्य शासनाचा निर्णय इंदापुरकरांसाठी अतिशय दुर्दैवी
अखेर सोलापूरकरांना दिलासा उजनीतून पाच टीएमसी पाणी उपसा आदेश रद्द
उजनी धरणाच्या पाणी वाटप वरून रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादी संघर्ष शिगेला