वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधारी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे . ऊर्जामंत्री नितीन राऊत घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याची टीका त्यांनी केली आहे.
वाढीव वीजबिलावरून सरकारने सवलत दिली आहे मात्र हि घोषणा म्हणजे धूळफेक असून भाजपने ३०० विलंबित युनिटपर्यंत बिल माफ करण्याची मागणी आमदार अतुल भाखळकर यांनी यावेळी केली आहे.
एका वृत्त वाहिनीशी बोलताना ते म्हणाले , ” वाढीव वीजबिलाने त्रस्त असलेल्या नागरिकांच्या जखमेवर मीट चोळण्याचे काम हे सरकार करत आहे त्यामुळे राज्य सरकारने ३०० युनिटपर्यँत वीजबिल माफ केले पाहिजे जो पर्यंत हे वीजबिल माफ होत नाही तोपर्यंत भाजपचे आंदोलन सुरूच राहील असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.