पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात वीजकपातीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यावर शेतकऱ्यांच्या वीजकपातीवर विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षाला चांगलचं धारेवर धरलं. भाजपकडून आज मुंबईत विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात पिंपरी चिंचवड येथील वीज समस्यांचा मुद्दा महेश लांडगे यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर त्यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील वीज समस्यांबाबत महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. यावेळी महाविकास आघाडीचा धिक्कार असो. अकार्यक्षम ऊर्जामंत्री यांचा धिक्कार असो… अशा आशयाचा फलक हातात घेवून सरकारचे लक्ष वेधले.
तसेच, सभागृहात हा मुद्दा उपस्थित करुन वीज समस्यांमुळे शहरातील उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे लघुउद्योजक, नागरिक हवालदिल झाले आहेत. राज्य सरकारने वीज समस्येबाबत ठोस पावले उचलावीत. अन्यथा पिंपरी-चिंचवडमधील नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशाराही दिला.
सध्या कडक उन्हाळा सुरू झाल्यामुळे उष्णतेचे प्रमाण वाढलेले आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. भोसरी वीज पुरवठ्याची समस्या सोडवण्यासाठी महावितरणने जो संपर्क क्रमांक दिला आहे. तो सतत व्यस्त व नॉटरिचेबल असतो. महावितरणचे अघिकारी वीज खंडित झाल्यावर उडवा-उडवीचे उत्तर देत असतात. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. तरी पिंपरी-चिंचवड शहरातील वीज समस्यांवर कायमस्वरुपी तोडगा काढावा व सर्वसामान्य नागरिकांना वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा.
दरम्यान, पुणे शहारातील साडेचार हजार पेक्षा जास्त उद्योज, व्यावसायिक यांना वीज नसल्याने लाखों रूपयांचा नुकसान झालं आहे. त्यातील ६० हजार घरांना वीज नसल्याने लोकांना अडचणीचा सामना करावा लागला. पुण्यातील उद्योजकांची चर्चा केली असता जवळपास १०० कोटींचं नुकसान झालं आहे. राज्यात बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांची वीजकपात केली जात आहे. त्याच पद्धतीचं वातावरण माझ्या शहरात देखील बघायला मिळत आहे. जर ऊर्जा विभाग अशा पद्धतीचं वागत असेल तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू, असा इशारा देखील आमदार महेश लांडगे यांनी राज्य सरकारला दिला.
Read also:
- ईमानदारी और सच्चाई का डर होना जरूरी है; जितेंद्र आव्हाडांना चंद्रकांत पाटलांचा टोला
- ” वडिलांच्या हत्यानंतर संघर्ष केला अन् नीच प्रवृत्तीला हरवलं “; निबाळकरांचं बीडमध्ये ज्वलंत भाषण
- “कुणी कुणाचे लाड अन् कुणी प्रसाद दिला, सांगता येणार नाही “; अजित पवारांची फटकेबाजी
- योगीच्या शपथविधीसाठी विरोधी पक्षांसह अंबानी, अदानी उपस्थित राहण्याची शक्यता
- कितीही हल्ला करा, आमचा महाविकास आघाडीचा मजबुत किल्ला; रोहित पवारांचा भाजपला टोला