सोलापूर: उजनी धरणातून इंदापूर तालुक्याला पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे.राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी हा निर्णय रद्द केला होता. हा निर्णय रद्द केल्या नंतर सोलापूर जिल्हा आणि इंदापूर तालुक्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले. सोलापुरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला तर इंदापूर मध्ये टायर जळत, आत्मदहनाचा इशारा देत दुखवटा पाळण्यात आला. मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंतजी माने Mohol’s NCP MLA Yashwantji Mane यांनी शेतकऱ्यांची बाजू घेऊन २२ एप्रिल चा आदेश रद्द करण्यासाठी प्रयत्न केला होता.
इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आणि विविध संघटनांनी यशवंत माने यांचा निषेध काल व्यक्त केला होता. याबाबत आता आमदार माने यांनी आपली बाजू मांडली आहे. मी सुरुवातीपासूनच मोहोळ मतदारसंघातील शेतकऱ्यांची बाजू मांडलेली आहे. मी मोहोळच्या जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी त्यांच्या बाजूने न्यायालयीन लढ्यात देखील होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मी जे केले ते योग्य होते आणि यापुढे सुद्धा मोहोळच्या जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी मी खंबीरपणे बाजू मांडणार असे देखील त्यांनी सांगितले आहे. MLA Yashwant Mane said, “I did the right thing on the water issue of Ujani.”
उजनीचे पाणी रद्द केल्यामुळे पालकमंत्री दत्ता भरणे Dattatray Bharane, the Guardian Minister of Solapur यांचा मोठा अपमान झाला आहे अशी इंदापूर तालुक्यातील जनतेची भावना आहे. आमदार यशवंत माने हे मोहोळचे आमदार आहेत आणि ते केवळ पाच वर्षांसाठीच आमदार आहेत आणि त्यांनी इंदापूर म्हणजेच आपल्या जन्मभूमी ची बाजू घ्यायला हवी होती अशी इंदापूरकरांची भावना आहे. मात्र मी मोहोळचा आमदार असल्याने जे काही केले आहे ते योग्य आहे. मी माझ्या मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी योग्य कार्य केलं आहे ,असा पाढा आमदार यशवंत माने यांनी वाचला आहे.