मुंबई – विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यात आली आहे. या वेतनवाढीवरून कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. वेतनवाढ मिळाली तरी विलीनीकरण होईपर्यंत आंदोलन कायम राहणार अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण ही प्रमुख मागणी घेऊन सरकार विरुद्ध एसटी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदान येथे आंदोलन सुरू आहे.
सर्व कर्मचारी विलीनीकरणावर ठाम आहोत. जोपर्यंत डंके की चोट पर विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत स्टिअरिंग हातात घेणार नाही, बसची घंटी वाजणार नाही. ऑईल बदली होणार नाही. आटपाडीतील एका एसटी कर्मचाऱ्याने सांगितले की, विलीनीकरणाच्या मागणीवर सरकारकडून कोणताही निर्णय घेतला जात नाही; पण आता तुटपुंजी वेतनवाढ देऊन आमच्या तोंडाला पाने पुसली आहेत. विलीनीकरण होईपर्यंत संप सुरूच ठेवणार आहे.
राष्ट्रवादीला झटका : आमदार बाबाजानी दुर्रानींनी दिला आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा
ऐन दिवाळीपासून लाखभर एस.टी. कर्मचारी आझाद मैदानात धडकला. आम्हा साऱ्यांची विलीनीकरणाची मागणी आहे. ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही आंदोलन थांबणार नाही. हे आंदोलन असेच सुरू राहील. सरकारच्या या मागण्या आम्हाला मान्य नाहीत, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. इतर आंदोलकही हीच भावना व्यक्त करत आहेत. त्यामुळे यापुढे आंदोलक अजून पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. असा इशाराच आंदोलकांनी दिला आहे.
मुंबईतल्या आझाद मैदानावरच ही परिस्थिती आहे, असे नव्हे. तर राज्यातल्या ठिकठिकाणच्या डेपोसमोर सुरू असलेल्या आंदोलकांचीही हीच भावना असल्याचे दिसते. बीड येथील एस.टी.डेपोसमोर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांनीही आक्रमक भूमिका घेत तूर्तास आंदोलन मागे घेणार नाही, असाच इशारा दिला. इथले कर्मचारीही फक्त विलीनीकरणाच्या मुद्द्यावर अडून बसले आहेत. त्यामुळे सरकारने उशिरा का होईना पगारवाढीची घेतलेली भूमिका आंदोलनावर मात्रा ठरेल, असे चिन्ह सध्या तरी दिसत नाही.
राज्य सरकारसोबत चर्चेला जाणाऱ्या पडळकरांना आणि खोत यांच्या शिष्टमंडळाला कर्मचाऱ्यांनी रोखलं
सरकारचा अंतरिम पगारवाढीचा कालचा प्रस्ताव पाहता एसटी संपात सहभागी झालेले सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी आझाद मैदान सोडत हे आंदोलनत्यांच्यापुरते थांबण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आझाद मैदानावर आक्रमक झालेले लाखभर एस.टी.कर्मचारी मागे हटायला तयार नाहीत. त्यांनी आंदोलनाचा वणवा असाच पेटता राहील, असा इशारा सरकार आणि विरोधकांनाही दिलाय. त्यामुळे आगामी काळात हे आंदोलन कुठले वळण घेणार, याची चर्चा सुरू झाली आहे.
Read Also :
- फरार घोषित केलेले परमबीर सिंग अखेर आले समोर; मुंबईत दाखल झाल्याची माहिती
- नवाब मलिक यांनी झईदा वानखेडे यांचा मृत्यूचा दाखला ट्विट करत पुन्हा माजवली खळबळ
- मोठी बातमी: आझाद मैदानावरील एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन मागे, सताभाऊ खोत यांची घोषणा
- ३२ जिल्ह्यांतील १०५ नगरपंचायतींच्या निवडणुकांचा रणसंग्राम: २१ डिसेंबर रोजी होणार मतदान
- रविकांत तुपकरांच्या अन्नत्यागाला अखेर यश; शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारने घेतले ९ निर्णय