मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष बांधणीसाठी नाशिक जिल्ह्याच्या दौरा केला. योगायोगाने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सुद्धा नाशिक दौऱ्यावरच होते. तसेच, दोघांच्याही थांबण्याची व्यवस्था, ही नाशिकच्या शासकीय विश्रामगृहातच असल्याने, त्यांच्यात युतीच्या संदर्भात काही चर्चा होणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून होते.
कोल्हापूरात पावसाच्या पाण्यानंतर आता पिण्याच्या पाण्याचे संकट; पुणे महापालिकेची मदतीसाठी धाव
या पार्श्वभूमीवर एक मोठी घडामोड घडून येत असून, राज ठाकरेंच्या परप्रांतीयांवरच्या भूमिकेसंबंधी असणाऱ्या अलीकडच्या काळातल्या काही क्लिप्स मनसेकडून, चंद्रकांत पाटलांना पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे, बराच काळापासून चर्चेत असलेली भाजप-मनसे युती प्रत्यक्षात येण्याच्या आशा आता पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
सांगलीतील भिलवडी बाजारपेठेचे अजित पवारांकडून बोटीतून पाहणी; खराब वातावरणामुळे कोल्हापूर दौरा रद्द
काही दिवसांपूर्वी दोन्ही नेत्यांची, नाशिकच्या शासकीय विश्रामगृहाच्या पार्किंग लॉटमध्ये ओझरती १५ मिनिटांची भेट झाली. या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेबाबत खुलासा करताना पाटलांनी सांगितले होते की, “ते आमच्यापासून दूर गेलेले नाहीत, मात्र त्यांच्या परप्रांतीयांविषयीच्या भूमिकेला आमचा विरोध असल्याने, ही युती होऊ शकत नाही,” तर यावर, “माझ्या अलीकडच्या भाषणाच्या त्यांनी किल्प्स ऐकल्या नसाव्यात, त्या त्यांनी आधी नीट ऐकून घ्याव्यात. मी त्यांना पाठवेन,” असं भाष्य राज ठाकरेंनी केलं होतं.
‘त्या’ घटनेवर महिलेने सोडले मौन; भास्कर जाधवांनीही दिली प्रतिक्रिया, म्हणतात…
त्यामुळे राज ठाकरे, आगामी महापालिका निवडणुकीत भाजपशी युती करण्यासाठी उत्सुक आहेत का, असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. मात्र, दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी मात्र या सगळ्या चर्चांना बाहेरचा रस्ता दाखवत, “मनसेसोबत युती करण्याबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही,” असं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. त्यामुळे, भाजप विरोधकांना बेमालूमपणे गुंडाळून त्यांना धक्का देणार का? की स्वबळावर लढून येऊन पुन्हा शिवसेनेसोबतच हात मिळवणी करणार? हे येत्या काळात कळेलच.
Read Also :
- राज ठाकरे आणि चंद्रकांतदादा एकमेकांना भेटण्याची शक्यता; मनसे आणि भाजपा एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण
- ब्रेकिंग! कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पांचा राजीनामा, भावुक होत केले मोठे विधान!
- भास्कर जाधवांच्या महिलांबरोबर गैरवर्तणूक आणि अरेरावी नंतर, संजय राऊत म्हणतात….
- ५ दिवसांनंतर तळीयेतील सर्च ऑपरेशन अखेर थांबलं, बेपत्तांना मृत घोषित करा! ग्रामस्थांची मागणी
- सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत, प्रीतम मुंडेकडून मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा