मुंबई : शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षाबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर धक्कादायक आरोप केले. दहशतवाद्यांकडून एकनाथ शिंदे यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली असता तरी शिंदेंची सुरक्षा उद्धव ठाकरे यांनी नाकारली होती. असं सुहास कांदे यांनी म्हटलं आहे. त्यासंदर्भात आता राज्यातील विविध राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नाशिकमध्ये हायव्होल्टेज ड्रामा होणार; सुहास कांदे, आदित्य ठाकरे येणार आमनसामने
यावरून आता मनसे नेते गजानन काळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट देखील केला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, राजसाहेब ठाकरे यांची सुरक्षा कमी केली. जीवाला धोका असूनही एकनाथ शिंदे यांना सुरक्षा पुरवू नका म्हणून आदेश. राजकारण वेगळं आणि कोणाच्या जीवावर बेतणारी गोष्ट असेल तर ती गोष्ट वेगळी आहे. जनाबसेनेच्या मोठे नवाब यांनी त्यांचे आदर्श पवारसाहेब यांच्याकडून राजकारणाचे काही धडे गिरवावेत. असंही गजानन काळे यांनी म्हटलं आहे.
एक स्वयंशिस्त, रोखठोक गतिमान अन् दुसरा राज्याच्या राजकारणातील नव्या पर्वाचा जनक
सुहास कांदे यांच्या आता पायाखालची वाळू सरकू लागली आहे, म्हणून ते उद्धव ठाकरे यांच्यावर अशा प्रकारे आरोप करीत आहेत. झे़ड प्लस, वाय ही सुरक्षा पुरवणे हा केंद्राचा विषय असतो, सुरक्षेच्या बाबतीत रोंग नंबर लागला आहे, आता केंद्राने या गद्दारांना वाय सुरक्षा पुरवली आहे. शंभुराज देसाई यांच्याकडे ग्रामीण सुरक्षा विभाग येतो. त्यामुळे मातोश्रीवरून फोन गेला हा आरोप खोटा आहे, असं शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीतून लांडे-पानसरे ‘बेदखल’; शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दुफळी
दरम्यान, शंभुराजेंना वर्षा बंगल्यावरून फोन आला होता की एकनाथ शिंदे यांना सुरक्षा देऊ नका. का सुरक्षा दिली नाही. असा सवाल देखील त्यांनी केला. यावर काॅंग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी या आरोपाचे खंडन केले आहे. सुरक्षा देण्यामागे गृहराज्यमंत्री घेत असतात तो निर्णय मुख्यमंत्री हे घेत नसतात. चिप सेक्रेटरीच्या खाली एक समिती असते. त्यावर ते अभ्यास करतात. मग सुरक्षा दिली जाते. तसेच एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री असल्याने त्यांना पोलीस खातं अधिक सुरक्षा देते यावर काही तथ्य नाही. असंही सतेज पाटलांनी म्हटलं आहे.
Read also
- “शिवसेनेच्या आमदार खासदारांनी रशिया- युक्रेन युद्धाकडून शिकावे”; दिपाली सय्यदचा सल्ला
- “जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव..;” अमृता फडणवीसांच्या अनोख्या शुभेच्या
- तर मग केंद्रात जाऊन अमित शहांचे पाय का चाटणार का? कांदेंवर दानवेंचा हल्लाबोल
- महाराष्ट्रातील ‘स्ट्रेट फॉरवर्ड’ नेते, कामासाठी ‘दादा’..; रोहित पवारांच्या अजित दादांना हटके शुभेच्छा
- “शिंदेंना जीवे मारण्याची धमकी दिली तेव्हा उद्धव ठाकरेंनी का सुरक्षा दिली नाही”