मुंबई : रिझर्व्ह बँकेने चलनात असलेली दोन हजार रूपयांची नोक बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा २०१६ प्रमाणे लोकांना दोन हजार रूपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. यावरून आता राज्यातील राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या निर्णयाबाबत केंद्र सरकारला खडेबोल सुनावत मोदींवर सडकून टीका केली आहे.
हेही वाचा…“एवढ्या मोठ्या कलाकाराला मारहाण झाल्याचं ऐकून दु:ख झालं”,शिरसाठ यांनी सुषमा अंधारेंना डिवचलं
राज ठाकरे म्हणाले की, “मी नोटबंदी झाली त्याचवेळी एक भाषण केलं होतं. हा धरसोड करण्याचा प्रकार आहे. तज्ज्ञांना विचारून या गोष्टी झाल्या असत्या, तर ही वेळ आली नसती. कधी एखादी गोष्ट आणायची, कधी बंद करायची. त्यावेळी नोटा आणल्या, तर त्या एटीएममध्येही जात नव्हत्या. म्हणजे नोटा आणताना त्या मशीनमध्ये जातात की नाही हेही बघितलं नव्हतं.
हेही वाचा…वानखेडेंना कोर्टाचा तात्पुरता दिलासा, तपासात आली मोठी ‘ही’ माहिती
राज ठाकरे पुढे म्हणाले की, “हे असले निर्णय देशाला परवडणारे नसतात. आता पुन्हा लोकांनी बँकेत पैसे टाकायचे. पुन्हा हे नव्या नोटा आणणार. हे असं सरकार चालत नाही. असे प्रयोग केले जात नाहीत.
READ ALSO :
हेही वाचा…“अंधेरी रात में गया, और अंधेरी रात में वापस आया,” फडणवीसांची ‘दिल्ली’ वारी’ चर्चेत ?
हेही वाचा…काॅंग्रेसचा नागपुरचा ‘वजीर’ भाजपमध्ये जाणार ? फडणवीसांनीच लावली फिल्डिंग , एकेकाळी त्यांनाच दिली होती टक्कर
हेही वाचा…“कर्नाटक हल्ल्याचा इतका राग? ओ शेठ तुम्ही नादच केला थेट”, नोटबंदीवरून राष्ट्रवादीचा मोदींना टोला
हेही वाचा…“मोदी, शहांच्या शंभर पिढ्या आल्या तरी बाळासाहेबांची शिवसेना संपणार नाही”
हेही वाचा…“आर्यनचा आंतरात्मा .., प्लीज.. मी तुम्हाला बाप म्हणून.. “, आर्यन खानसाठी शाहरूख हातापाया पडला, वाचा सविस्तर…