महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी चक्क पालकमंत्री बदलीची मागणी केली आहे. नवी मुंबईत अण्णासाहेब मिसाळ यांची स्थगित बदली रद्द करत त्यांच्या जागी नागपूरचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र आयुक्त बदलीनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापायला लागलं आहे. नवी मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना बदलून पाहा, असा खोचक टोला मनसेने लगावला आहे.
“ठाणे जिल्ह्यातील चार महापालिका आयुक्त बदलले. त्याचवेळी नवी मुंबई पालिकेचे तत्कालीन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांचीही बदली झाली होती. मग परत दोन दिवसात बदली रद्द झाली, तर आज परत मिसाळ यांची बदली होऊन नवीन आयुक्तपदी अभिजित बांगर यांना आणले. सगळे प्रयोग करुन पण कोरोना नियंत्रणात येत नसेल, तर एकदा पालकमंत्री पण बदलून बघा..” असे ट्वीट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केले आहे.
ठाणे जिल्ह्यातील 4 मनपा आयुक्त बदलले त्याचवेळी नवी मुंबई तत्कालिन आयुक्त मिसाळ यांची पण बदली झाली हाेती मग परत 2 दिवसात बदली रद्द झाली तर आज परत मिसाळ यांची बदली हाेऊन नवीन आयुक्तपदी अभिजित बांगर यांना आणले.
सगळे प्रयाेग झाले असतील तर
एकदा पालकमंत्री पण बदलून बघा@CMOMaharashtra pic.twitter.com/2k8KBXWUZX— Gajanan Kale MNS (@GajananKaleMNS) July 14, 2020