मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अनेक नेते गेल्या काही वर्षांमध्ये दुसऱ्या पक्षात गेल्याचे पाहायला मिळाले आहे. यासंदर्भात आता एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे.
राज ठाकरे यांनी अतुल भातखळकर हे माझ्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं तिकीट मागायला आले होते. मी नितीन गडकरींना फोन केला आणि त्यांना भाजपात राहायला सांगितलं होतं, असा गोप्यस्फोट देखील केला.
अनेक नेते पक्षसोडून गेले याबाबत विचारले असता राज ठाकरे म्हणाले की, मनसेला नेते सोडून गेले असं अनेकदा सांगितलं जातं. पण जे सोडून गेले त्यांच्या फक्त एका बातमीशिवाय दुसरं काही झालं का? मला एक असं उदाहरण दाखवून द्यावं. माझ्याकडे बघून ते पक्षात आले आणि स्थानिक कारणांमुळे पक्ष सोडून गेले. आता पक्षांतराच्या गोष्टी होत असतात. नुकतंच पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचे नेते भाजपमध्ये गेले. त्यांचं काय झालं?
2009 च्या विधानसभा निवडणुकीवेळी अतुल भातखळकर माझ्याकडे विधानसभेचं तिकीट मागायला आले होते. मी नितीन गडकरींना फोन केला होता. त्या दोघांनाही मी सांगितलं की, असं करू नका. ज्या पक्षात इतकी वर्ष वाढलात, राग आला म्हणून असं करू नका. आहात तिथंच रहा, हा वेडपटपणा करू नका, असा गौप्यस्फोट राज ठाकरेंनी केला.
Read Also :
- ‘मिळेल त्या वाहनाने राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर या’
- ‘पेट्रोल-डिझेलची ‘शंभरी’ केल्याबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन’, काँग्रेसचा पुणेरी टोला
- पहिल्यांदा संसदेत जाताना शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना दिला होता ‘हा’ मोलाचा सल्ला
- ‘संभाजीराजेंची हेरगिरी करण्याचा प्रश्नच नाही, त्यांचा गैरसमज दूर केला’
- मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलेल्या ‘त्या’ सरपंचांनी गाव कोरोनामुक्त कसे केले ? वाचा