गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या मुद्द्यावरुन राज्यात चांगलेच राजकारण रंगत आहे. “परराज्यातील लोकांना पाठवलं, ते परतही आले, मात्र कोकणात जाण्यासाठी शासनाने काहीच व्यवस्था केलेली नाही” अशा शब्दात मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
“गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांना अडचणी आहेत, मात्र बकरी ईद साजरा करणाऱ्यांना सुविधा दिल्या” अशी बोचरी टीकाही देशपांडे यांनी केली.
भाजप खासदार नारायण राणे यांनी गणेशोत्सव काळात चाकरमान्यांना कोकणात जाऊ देण्याचा मुद्दा उचलून धरला असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही यात उडी घेतली आहे
“कोकणवासी दरवर्षी गणेशोत्सवासाठी गावी जातात, पण कोकणातल्या माणसांना आता गावी जाण्यासाठी काहीच व्यवस्था शासनाने केलेली नाही. परराज्यातल्या लोकांना पाठवलं, त्यांची व्यवस्था केली, ते जाऊन परत आलेही” असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला. “गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या लोकांना अडचणी आहेत, तर बकरी ईद साजरा करणाऱ्यांना मात्र सोयी सुविधा करण्यात आल्या आहेत” अशी टीकाही देशपांडे यांनी केली आहे.