नागपूर: देशातील वाढत्या महागाईने लोकांचे नुकसान केले आहे. केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर सर्वाधिक युवकांचे नुकसान झाले आहे. देशातील तरुण हे बेरोजगार झाले आहे. यामुळे हे युथ येणाऱ्या २०२४ निवडणुकीत हे भाजपचे सरकार उलथून लावतील आणि काँग्रेसचे सरकार सत्तेत येईल असा इशारा राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिला. ते नागपुरात संविधान चौकात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या हल्ला बोल आंदोलना दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलत होते.
हे पण वाचा: आठवडा उलटून गेला…पूरग्रस्तांसाठी पॅकेज कधी? अजित पवारांनी केले भाष्य
युवक काँग्रेसच्या वतीने सध्याच्या वाढत्या महागाई विरोधात सोमवारी हल्ला बोल आंदोलन केले. यावेळी युवक काँग्रेसने महागाई आणि मोदी सरकार विरोधात हातात फलक घेऊन वाढत्या महागाईचा विरोध केला. यावेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या मोर्चाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार हे ही यावेळी आले होते.
हे पण वाचा: पूरग्रस्त भागातील वीज, पाणी पुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
हे पण वाचा: कोल्हापुरात अत्यावश्यक सेवा सोडून इतर वाहनांना इंधन न देण्याचा निर्णय
यावेळी बोलताना म्हणाले लोकशाही पद्धतीने सरकार टिकवायचे असेल तर लोकांच्या विश्वासाने ही टिकवली पाहिजे. पण हे सरकार लोकांना धमकवण्याचे काम करत आहे. या सरकारला विसर पडला आहे की, ही जनता इंग्रजांना घाबरली नाही तर या तानाशाहीला काय घाबरणार नाही. २०२४ मध्ये या सरकारला घराचा रस्ता पहावा लागेल असे मंत्री सुनील केदार यावेळी म्हणाले. पण युथ काँग्रेस असो की काँग्रेस असो हे सामान्य माणसाच्या पाठीशी आहे.
Read Also :
- नागपूर येथील निर्बंध शितील करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांचे पत्र
- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर सातारा दौऱ्यावर, पूर परिस्थीतीची करणार पहाणी
- राज्यपाल कोश्यारींकडून ठाकरे सरकारचे कौतुक, महापुराच्या संकटात उत्तम कामगिरी
- ‘आम्हीही व्यवस्थेचा भाग, लोकशाहीची थट्टा करु नका’, राऊतांच्या टिकेला प्रवीण दरेकरांचे प्रत्युत्तर
- कोकणसाठी कटू निर्णय घेण्याची गरज, ६ जिल्ह्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान