पुणे : भारतीय जनता पार्टीच्या जंगली महाराज रस्त्यावरील कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादी भवन सुरू केल्यानंतर भाजपने लगेचच हा निर्णय घेतला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे, भाजपमधून खासदार गिरीष बापट यांचे पुण्यातील वर्चस्व कमी केले जात असल्याचे सध्या बोलले जात आहे. भाजपचे नवे कार्यालय राष्ट्रवादी भवनपासून जवळच आहे. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी मात्र ‘आम्ही राष्ट्रवादीपासून फार लांब आहोत व लांबच राहणार’ असे उत्तर दिले.
भाजपच्या माजी मंत्र्याची गळा दाबून हत्या; राहत्या घरातच सापडला मृतदेह
शनिवारवाडा ते महापालिका दरम्यानच्या रस्त्यावर एका इमारतीत हे नवे कार्यालय सुरू करण्यात आले. नेते, पदाधिकारी वगळता भाजप कार्यकर्त्यांना याची पुरेशी कल्पना नव्हती असे दिसते; कारण अचानकच हा निर्णय झाला, अशी माहिती देण्यात आली.
नेता-अभिनेता असला तरी घेणं-देणं नाही, गर्दी होऊ देणार नाही! नांगरे पाटीलांनी ठणकावले
जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सन्मानचा पहिला मजला भाजप कार्यालय म्हणून वापरत होते. खासदार गिरीश बापट यांनी या जागेत कार्यालय आणले. त्याआधी ते जोगेश्वरीच्या बोळामध्ये अप्पा बळवंत चौकात होते. सन्मानमध्ये कार्यालय सुरू झाल्यापासून भाजपाच्या राजकीय यशाची पुण्यातील कमान नेहमी चढती राहिली अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. महापालिकेत प्रथमच स्वबळावर सत्ताही भाजपला याच कार्यालयात असताना मिळाली. आता ते बदलण्याचे कारण कळत नाही, असे काही कार्यकर्ते म्हणाले. हॉटेल सन्मानच्या संचालक मंडळाकडूनही याची विशेष माहिती मिळाली नाही. हे कार्यालय भाडेतत्त्वावरच होते व नवे कार्यालयही भाडेतत्त्वावरच आहे.
…त्यामुळे अण्णा पुन्हा उपोषणाला बसणार, दिला महाविकास आघाडीला सरकाला इशारा
भाजपमधून खासदार बापट यांचे पुण्यातील वर्चस्व कमी केले जात असल्याचे सध्या बोलले जात असते. कोल्हापूरहून पुण्यात येऊन कोथरूडमधून आमदार झालेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पुण्यात स्वतंत्र गट तयार होतो आहे. कार्यालयाच्या स्थलांतरामागे अशा काही गोष्टी असाव्यात अशी चर्चा आहे.
‘तुमचा भुजबळ करू’ ही धमकी, आता त्यांना देता येणार नाही’
मुळीक यांनी मात्र याला नकार दिला. ती जागा कमी पडत होती. भाजपचा शहरातील विस्तार लक्षात घेता, बैठका, गटमेळावे, गटचर्चा यांसाठी मोठ्या जागेची गरज होती. त्यामुळे कार्यालय बदलाचा निर्णय घेण्यात आला. नव्या जागेत कार्यालय सुरू झाले असले तरी तिथे काही आवश्यक कामे करून घेतली जात आहेत. ती झाली की जाहीरपणे कार्यक्रम करून कार्यालय सुरू केले जाईल, असे मुळीक यांनी सांगितले.
Read Also :
- ‘बंद करून दाखवले’ याचेही श्रेय घेणार का? नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
- ‘बाप्पाने राज्य सरकारला हीच बुद्धी द्यावी की…’, फडणवीसांचे गणरायाला साकडे
- ‘दंडुकेशाहीच्या जोरावर हे सरकार माध्यमांवर दबाव निर्माण करतंय,’ फडणवीसांचा आरोप
- ‘आव गोयंचो सायबा, मी पुन्हा येईन’, राष्ट्रवादीचा व्यंगचित्रातून फडणवीसांवर निशाणा
- पटोलेंचा पवारांना टोला, म्हणाले “काँग्रेसनं जमीनी राखायला दिल्या अन् त्यांनी…”