औरंगाबाद : कोरोना व्हायरस संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात एप्रिल महिन्यापासून कडक निर्बंध लागू आहेत. सध्या 1 जूनपर्यंत लागू असलेले हे निर्बंध हळूहळू शिथिल होणार असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता लॉकडाऊन वाढवला तरी तो झुगारून दुकानं सुरू करू अशी आक्रमक भूमिका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.
1 जूननंतर निर्बंध वाढणार की शिथिल होणार, याबाबत अद्याप सरकारकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. याच पार्श्वभूमीवर आता जलील यांनी ठाकरे सरकारने आता कोणतीही कारवाई केली तर आम्ही 1 जुनपासून औरंगाबादमधील दुकानं उघडणारचं, असा इशारा दिला आहे.
इम्तियाज जलील म्हणाले की, दुकानदारांचे हप्ते आणि त्यावरील व्याज माफ करण्यासाठी बँका तयार आहेत, असे सरकारने जाहीर करावे. अन्यथा राज्य सरकारने लॉकडाऊन वाढवला तरी आम्ही तो झुगारुन दुकानं सुरु करु. मग सरकारला जे काही करायचय ते करु द्या.
मुख्यमंत्री ठाकरे टीव्हीवर येऊन फक्त ज्ञान देतात. त्यांना राज्याच्यादृष्टीने काय चांगला निर्णय घ्यायचाय तो घेऊ दे. पण औरंगाबादसाठी आम्ही हा निर्णय मान्य करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
Read Also :
- ‘राहुल गांधींना ‘पंतप्रधानपदी’ पाहणे म्हणजे मोदींना ‘पंतप्रधान’ म्हणून कायम ठेवण्याचा प्रयत्न’
- ‘… तर गंगेत इतके शव वाहताना पाहावे लागले नसते’, यशोमती ठाकूर यांची मोदींवर टीका
- ‘काहीजण रडकथेचाच डाव मांडून ‘रडकी बात’ वेशीवर टांगतात’
- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गफ्फार मलिक यांचे निधन
- ‘… अन् कोरोनारुग्णांसोबत रोहित पवारांनी ‘झिगांट’वर धरला ठेका’