भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर पुन्हा एकदा त्यांच्या सल्ल्याने चर्चेत आले आहेत . देशात कोरोनाला संपवायचे असेलतर रामजन्म भूमीपर्यंत हनुमान चालीसा म्हणा असा अजब सल्ला प्रज्ञासिंह यांनी दिला आहे . त्यांनी ट्विटवरून हा सल्ला दिला आहे.
देशभरात आणि जगभरात कोरोनाला रोखण्यासाठी वेग वेगळे दावे करण्यात येत आहे. मात्र अश्यातच प्रजिसिंह यांनी केलेला दावा चांगलाच चर्चेत आला आहे. “देशात कोरोनाला संपवण्यासाठी आणि लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी एक अध्यात्मिक प्रयत्न करुया. 5 ऑगस्टपर्यंत आपापल्या घरी दररोज संध्याकाळी सात वाजता पाच वेळा हनुमान चालीसा म्हणा. या कार्यक्रमाचा समारोप 5 ऑगस्ट रोजी घरात दिवा लावून रामलल्लाच्या आरतीने करा”, असे आवाहन प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केला.
आइए हम सब मिलकर कोरोना महामारी को समाप्त करने के लिए लोगों के अच्छे स्वास्थ्य की कामना के लिए एक आध्यात्मिक प्रयास करें आज25 से 5 अगस्त तक प्रतिदिन शाम 7:00 बजे अपने घरों में हनुमान चालीसा का 5 बार पाठकरें5 अगस्त को अनुष्ठान का रामलला की आरती के साथ घरों में दीप जलाकर समापन करें pic.twitter.com/Ba0J2KrkA8
— Sadhvi Pragya singh thakur (@SadhviPragya_MP) July 25, 2020
“भोपाळमधील लॉकडाऊन 4 ऑगस्टला संपेल. पण आपण 5 ऑगस्ट रोजी या कार्यक्रमाचा समारोप करु. प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादानेच अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी भव्य राम मंदिराचं भूमीपूजन आहे. आपण सर्व 5 ऑगस्ट हा दिवस दिवाळीसारखा साजरा करुया. 5 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजता दिवा लावून हनुमान चालिसाचं पठण करुया. या कार्यक्रमाचा व्हिडीओ आपण फेसबूकवरही व्हायरल करु. देशभरातील नागरिकांनी एका सुरात हनुमान चालिसाचं पठण केलं तर निश्चितच देशात कोरोना रोखण्यासाठी मदत होईल”, असा दावा प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केला.