नवी दिल्ली : संसदेच्या अधिवेशनाचा पहिला दिवस होता. अपेक्षेप्रमाणे संसदेचे अधिवेशन पहिल्याच दिवशी चांगलेच गाजले आहे. पहिल्याच दिवशी तब्ब्ल १२ खासदारांचे निलंबन झाल्याने चांगलीच राजकीय उलथापालथ झाली आहे. यावरून विरोधी पक्षातून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नाराजीचा सूर उमटण्यास सुरुवात झाली आहे.
संसदेच्या अधिवेशनात गोंधळ: १२ खासदारांच निलबंन, शिवसेनेच्या दोन खासदारांचा समावेश
पहिल्याच दिवशी तब्बल १२ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबित झालेल्या खासदारांमध्ये महाराष्ट्रातील दोन खासदार आहेत. यामध्ये शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी आणि अनिल देसाई यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ही कारवाई मागील अधिवेशन सत्र काळातील आहे. त्यामुळे निलंबित खासदारांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होता येणार नाही.
याबाबत आता खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी संताप व्यक्त केला आहे. संसद सभापतींनी निर्णय घेताना आपली बाजू ऐकून न घेतल्याबद्दल चतुर्वेदी यांनी त्रीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. आपल्या देशात आरोपीलाही बाजू मांडण्याचा हक्क आहे. जिल्हा कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत आरोपीचं म्हणणं ऐकून घेतलं जातं. त्याच्यासाठी वकील उपलब्ध करून दिला जातो. गरज पडल्यास सरकारी अधिकारीही तिथे आपली भूमिका मांडतात. एकीकडे आरोपीला असे अधिकार असताना आम्ही जनतेचे लोकप्रतिनिधी असतानाही आम्हाला मात्र कोणतीही संधी दिली गेली नाही. आमची बाजू न ऐकताच आमच्यावर कारवाई करण्यात आली, असं म्हणत चतुर्वेदी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीकडे लागले सर्व राजकीय पक्षांचे लक्ष
राज्यसभेतील ज्या घटनेवरून ही कारवाई करण्यात आली त्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे. फुटेज नीट पाहिल्यास पुरुष मार्शल महिला खासदारांना मारहाण करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे आणि असं असतानाही कारवाई आमच्यावर करण्यात आली. ही कारवाईच असंसदीय आहे, असा आरोपही प्रियांका यांनी केला आहे. काँग्रेस सदस्य रिपुन बोरा यांनीही आजची निलंबनाची कारवाई म्हणजे लोकशाही आणि संविधानाची हत्या असल्याचा आरोप केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मर्जीनुसार सगळं काही होतं, असं देखील ते म्हणाले आहेत.
Read Also :
- संसदेतील बारा खासदारांच्या निलंबनावरून सुप्रिया सुळे म्हणाल्या… ‘हा’ तर रडीचा डाव
- 12 खासदार निलंबन प्रकरणी संसदेत गदारोळ, लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांचा सभात्याग
- “उद्धव ठाकरेंनी सत्तेपोटी भगवा सोडला, हिरवा हातात घेतला”; सोमय्यांची घणाघाती टीका
- महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट?; ममता बॅनर्जी आजपासून तीन दिवसीय दौऱ्यावर…
- कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी दिग्ग्ज मंत्री मैदानात ; पुन्हा एकदा धावणार समझोता एक्सप्रेस?