कोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच, त्यांनी १६ जून पासून कोल्हापुरातून मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती मराठा मोर्चा काढण्यात चालढकल करत असतील, यामुळे मराठा समाजाचे मोठे नुकसान होईल, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. तसेच, त्यांनी मोर्चा काढायचे रद्द करून राज्य सरकारला मराठा आरक्षणाच्या संकटातून वाचवण्यासाठी आपण मदत करणार आहात का ?, असा सवाल संभाजीराजेंना विचारला होता. यावर आता संभाजीराजेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
‘चंद्रकांत पाटलांना उत्तर देणे मी रास्त समजत नाही, फडणवीस बोलल्यावर बघू’, असे संभाजीराजे छत्रपतींनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस ज्यावेळी माझ्याबद्दल काही बोलतील, त्यावेळी माझे उत्तर असेल. बाकी अन्य कोणालाही उत्तर देण्यास मी रास्त समजत नाही. फडणवीस बोलल्यानंतर बघू. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याबाबत मला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही, असे संभाजीराजे म्हणाले.
Read Also :
- ‘भाजपमध्ये गेलेले नेते पुन्हा काँग्रेसमध्ये येण्यास इच्छूक, पण…’
- ‘शिवसेनेला वचन पळणारा मित्र म्हणणे ही पवारांची राजकीय हतबलता’
- वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंपाठोपाठ आता आदित्य ठाकरेंनीही केले ‘हे’ आवाहन
- कोरोनारुग्ण आणि मृतांची आकडेवारी लपवली जात आहे ? आरोग्य विभाग म्हणाले…
- 12 वीच्या परीक्षांचे मूल्यमापनाचे धोरण व निकालाची तारीख लवकरच जाहीर करणार, शिक्षणमंत्र्यांची माहिती