प्रतिनिधी / ओंकार गोरे
संकट आलं की पॅकेज जाहीर केली जातात. ही आपली प्रथा आणि परंपरा आहे. एवढ्या हजार कोटीचं पॅकेज… कुठे जातं कुणालाच माहीत नाही… मला अशी थोतांड येत नाही. मला खोटं बोलता येत नाही जे करायचं ते प्रामाणिकपणे केलं जाईल. ते केल्याशिवाय राहणार नाही, वगैरे…वगैरे प्रकारची थोतांड वक्तव्य करत पूरग्रस्तभागाचा दौराकरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईकडे रवाना झाले. दोन दिवस विश्रांती घेतली अन् ११ हजार ५०० कोटीचे पॅकेज पूरग्रस्तांसाठी जाहिर केलं. पॅकेजवर भरोसा नाही… असलं थोतांड करणार नाही… म्हणनारे मुख्यमंत्री महोदय मग मुंबईत गेले की लगेच भूमिका बदलताना तुम्हाला काहीच कसं वाटतं नाही. दौऱ्यावेळी पॅकेजवर भरवसा नाही म्हणता. मग मुंबईतून जाहिर करतावेळी तुमचा भरोसा कसा बसतो. याचे उत्तर द्या की….
महाडच्या तळीये गावात अतिवृष्टीमुळे दरड कोसळली. त्यामुळे कित्तेक निष्पाप लोकांचे बळी गेले. कित्तेकांचे संसार उघड्यावर आले. विविध नेत्यांबरोबरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीचा दौरा केला. दौऱ्यादरम्यान, लोक नुकसान भरपाईची मागणी करत असताना मुख्यमंत्री म्हणाले, माझा पॅकेजवर भरवसा नाही. असली थोडांत मी करणार नाही. कायस्वरूपी व्यवस्था करू, असे सांगण्यात आले. त्यानंतर कोकणसह कोल्हापूर, सातारा, सांगली दौऱ्यावर मुख्यमंत्री निघाले. सांगलीतील जनतेशी संवाद साधत असताना ठाकरेंनी पुन्हा त्याच गोष्टीची पुनरावृत्ती केली.
सांगलीत बोलताना ठाकरे म्हणाले, संकट आलं की पॅकेज जाहीर केली जातात. ही आपली प्रथा आणि परंपरा आहे. एवढ्या हजार कोटीचं पॅकेज… कुठे जातं कुणालाच माहीत नाही… मला अशी थोतांड येत नाही. मला खोटं बोलता येत नाही… जे करायचं ते प्रामाणिकपणे केलं जाईल. ते केल्याशिवाय राहणार नाही, असे सांगत ठरलेल्या स्क्रिप्टचा पाढा मुख्यमंत्र्यांनी सांगलीकरांसमोर वाचून दाखवला. एवढेच नव्हे तर पॅकेज जाहीर होत, पण ते जात कुठे?, असा प्रश्न त्यांना सांगलीकरांना केला. आता मुख्यमंत्री महोदय, पॅकेज तुम्ही जाहीर करता. वाटप तुमचं प्रशासन करतयं आणि तुम्ही जनतेला विचारता, पॅकेज कुठे जाते म्हणून…. याचे उत्तर जनतेला माहित आहे का?, जनता पॅकेज जाहीर करते का? केवळ प्रसिद्धीसाठी काहीही कराल का मुख्यमंत्री महोदय?, जनतेला संकटात पाहून अशी थोतांड करताना तुम्हाला काहीच कसं वाचत नाही? महाराष्ट्रातील जनता संकटात असताना केवळ प्रसिद्धीसाठी ठरलेल्या स्क्रिप्टचा पाढा वाचताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही?, असे प्रश्न आता जनता करू लागली आहे.
तोक्ते चक्रीवादळातही ठरलेली स्क्रिप्ट
मे २०२१ महिन्याच्या अखेरीस कोकण किनारपट्टीवर तौक्ते चक्रीवादळ धडकले. यामध्ये राज्य शासनाच्या पंचनाम्यानूसार ३७ कोटी १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला. प्रत्यक्ष नुकसानीचा आकडा अधिकचा असेल, यात दुमत नाही. दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री महोदयांनी कोकण दौरा केला. दौऱ्यादरम्यान नागरिकांशी आणि माध्यमांशी संवाद साधत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ठरलेला पाढा वाचवून दाखवला. संकट आले की पॅकेज जाहीर होते. प्रत्यक्ष मात्र मदत मिळत नाही. त्यामुळे पॅकेजवर माझा भरवसा नाही. असली थोतांड मी करणार नाही.. वगैरे वगैरे प्रकारची ठरलेली स्क्रिप्ट मुख्यमंत्री ठाकरेंनी वाचून दाखवली.
दौऱ्यादरम्यान पॅकेज जाहीर करणार नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यानी मात्र मुंबईत पोहताच नुकसानग्रस्तांना ४७ कोटी १५ लाख रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. त्यामध्ये मनुष्य हानी ४१ लाख, पशुधन ६ लाख, घरगुती वस्तू नुकसान ११ लाख, घरांची पडझड २५ कोटी, जनावराचे गोठे ३४ लाख, मत्या व्यवस्थित ४ कोटी ८४ लाख, शेती नुकसान १६ कोटी ४८ लाख, असे एकूण ३७ कोटी १५ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्री महोदय तुम्हाला पॅकेजच जाहीर करायच होत तर मग नागरिकांसमोर असलं थोतांड करायची काय गरज होती?, असले थोतांड अजून किती दिवस करणार आहात?, यामागचे नेमके धोरण आहे तरी काय? हे एकदा जनतेला सांगून द्या. अन्यथा जनता आगामी निवडणूकीत तुम्हाला तुमची जागा नक्की दाखवून देईल, यात दुमत नाही.
निसर्ग चक्रीवादळातील मदतीची घोषणा अद्याप कागदावर
जून २०२० मध्ये निसर्ग चक्कीवादळ थैमान घातले होते. यावेळी कोकणकिनारपट्टीवरील अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला होता. रायगड, रत्नागिरी, सिंधुर्दुध, कोकण किनारपट्टी, मुंबई, अलिबाग यांसांरख्या शहरातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना मोठा फटका बसला होता. वादळानंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून रायगडसाठी १०० कोटी, रत्नागिरीला ७५ कोटी आणि सिंधुदूर्गला २५ कोटी रुपयांची मदत शासनाने जाहीर केली.
त्याचबरोबर शेतीच्या नुकसानीसाठी हेक्टरी ५० हजार रुपये, पक्क्या घराचं पूर्णत: नुकसान झालेल्या कुटुंबांना सुधारित दरांनुसार दीड लाख रुपये, पक्क्या किंवा कच्च्या घरांचं अंशत: (किमान १५ टक्के) नुकसान झालेल्या कुटुंबांना १५ हजार रुपये, नष्ट झालेल्या झोपडीसाठी १५ हजार रुपये, घर पूर्णत: कोसळलेल्या कुटुंबांना कपडे व भांड्यांच्या खर्चासाठी प्रत्येकी ५ हजारप्रमाणे एकूण १० हजार रुपये, नुकसानग्रस्त दुकानमालक व टपरीचालकांना नुकसानीच्या ७५ टक्के मर्यादेत कमाल १० हजार रुपये मदत देण्याची सरकारने घोषणा केली. या गोष्टीला १ वर्ष उलटूनही अद्याप मिळालेली नसून ती कधी मिळणार?, याचा कोणाला अंदाज सुद्धा नाही.
जनताच तुम्हाला धडा शिकवेल…
महाऱाष्ट्रातील इतर घटनांबरोबरच जून २०२० च्या सुमारास धडकेल्या चक्कीवादळातील नुकसान ग्रस्तांना जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजची अद्याप एक फुटी कवडीही कुटुंबीयांना मिळालेली नाही. त्यामुळे, तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत असताना मुख्यमंत्र्यांना पॅकेजबद्दल विचारले असता “माझा पॅकेजवर विश्वास नाही, प्रत्यक्ष मदत करणे गरजेचे आहे”, अशी स्पष्टोक्ती खुद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिली होती. त्याचीच पुनरावृत्ती महाड येथील तळीये आणि कोल्हापूर, सांगली दौऱ्यादरम्यान दिसून आली. मुख्यमंत्री महोदय अगर तुमचाच पॅकेजवर विश्वास नाही, तर जनता काय ठेवणार?, विश्वास नसताना पॅकेजची घोषणा करण्याचा अट्टहास कशासाठी?, दौऱ्यादरम्यान एक बोलायच आणि मुंबईत आल्यावर भलतचं काही करायचं, हे किती दिवस करणार आहात?, तुमची स्क्रिप्ट अशीच चालली तर जनता एक ना एक दिवस तुम्हाला तुमची जागा नक्की दाखवून देईल, हे नक्की.