मुंबई : गेल्या अनेक दिवसापासून गोरेगाव पत्राचाळ प्रकरण सध्या राज्यात खुप गाजत आहे. या प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या इडीच्या अटकेत आहेत. मात्र याप्रकरणात आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील चौकशी व्हावी अशी मागणी भाजपने केली आहे. तसेच याप्रकरणी पत्रकार परिषद घेत शरद पवारांनी माझी चौकशी करा असं म्हटलं आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. त्यावर आता भाजपने प्रत्युत्तारादाखल सवाल केला आहे.
“तर आम्ही उद्धव ठाकरे यांचं स्वागत करू”; खासदार राहुल शेवाळे यांचं वक्तव्य
इडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात पत्राचाळ प्रकरणी मुख्यमंत्री आणि माजी कृषीमंत्री यांच्या उपस्थित एक बैठक पार पडली होती. त्यावरून भाजपने शरद पवारांची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. याबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी असं म्हटलं आहे की, शरद पवारांनी 20 जानेवारी 2006 रोजी बैठक घेतली होती. या बैठकीत सर्व अधिकारी आणि संबंधित व्यक्ती उपस्थित होते. तसेच पत्राचाळ प्रकरणी शरद पवारांनी त्यांची बैठक घेतली. त्यात काय नवल असा सवाल आव्हाडांनी भाजपला केला आहे.
“आम्ही ५० जण बाजीगर होतो, त्यामुळे आम्हाला गद्दार म्हणायच्या भानगडीत पडू नका”; शहाजी पाटिल
त्यावरून भाजपने असं म्हटलं आहे की, पवार साहेब तुम्हीच सांगा पत्राचाळीतील 700 च्या वर बेघर झालेल्या मराठी कुटुंबियांना की, केंद्रीय कृषीमंत्री असताना, एका चाळीच्या पुनर्वसनासाठी म्हाडा च्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीच काय प्रयोजन होतं? देशाचे कृषीमंत्री म्हाडाच्या बैठकीत कशासाठी ? असा सवाल त्यांनी केला आहे. पवार साहेब, तुमच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प होत होता. तर एवढी ससेहोलपट मराठी माणसाची का झाली? बेघर झालेले मराठी कुटुंबियांची वेदना जाणून का घेतल्या नाहीत ? जितेंद्र आव्हाड अश्या निष्फळ बैठका घेऊन काय फायदा ? 700 च्या वर मराठी कुटुंब बेघर झालेत त्याचं काय? असा सवाल भाजपने केला आहे.
पत्राचाळमधील सर्व पैसे राऊतांनी ‘ठाकरे’ चित्रपटात वळवले; इडीचा दावा, राऊत अडचणीत
दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घोटाळ्यातून आलेले बेहिशेबी पैसे आपल्या कुटुंबीयांच्या नावे सुरू केलेल्या बनावट कंपन्यांमध्ये वळवले. ठाकरे या चित्रपटाच्या प्रकल्पातही त्यांनी बेहिशेबी पैसे वळवले असा दावा या प्रकरणात इडीच्या महत्त्वाच्या साक्षीदार असलेल्या स्वप्ना पाटकर यांनी आपल्या जबाबात केला आहे. तसेच संजय राऊत यांनी ‘राऊतर्स एंटरटेन्मेंट एलएलपी’ नावाची कंपनी स्थापन केली. त्याद्वारे त्यांनी ठाकरे या चित्रपटाची निर्मिती केली. असं देखील इडीच्या आरोपपत्रात म्हटलं आहे. त्या प्रकल्पात त्यांनी आपले बेहिशेबी पैसे वळवले. सोबतच एप्रिल-२०२१ मध्ये मद्य व्यवसायाच्या एका कंपनीतही त्यांचे स्वारस्य होते. अलीकडच्या काळात कुटुंबीयांच्या नावे बनावट कंपन्या सुरू करूनही त्यात बेहिशेबी पैसे वळवणे त्यांनी सुरू केले होते’, असादेखील दावा पाटकर यांनी जबाबात केला आहे. अशाप्रकारे संजय राऊत हे जाणूनबुजून गुन्ह्यातील उत्पन्न निर्माण करण्याच्या प्रक्रियेत आणि मालमत्तेचे संपादन करण्यासाठी आणि इतर संस्थांकडे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेत सामील होते, असा ईडीचा आरोप आहे.
माननीय @PawarSpeaks साहेब, तुम्हीच सांगा पत्राचाळीतील 700 च्या वर बेघर झालेल्या मराठी कुटुंबियांना की, केंद्रीय कृषिमंत्री पदी असताना, एका चाळीच्या पुनर्वसनसाठी ‘म्हाडा’ च्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीच काय प्रयोजन होतं?
देशाचे कृषीमंत्री म्हाडाच्या बैठकीत कशासाठी?
१/२
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 21, 2022
Read also
- “भाजपला टक्कर देण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच असं सध्या लोकांना वाटतेय”
- रामदास आठवलेंच्या पक्षातील सचिवांनी केला शिवसेनेत प्रवेश; थेट पक्षचं केलं सेनेत विलीन
- “टपरीवर काम केलं नाही, पण मी कुणाला चुना लावला नाही”; गुलाबराव पाटलांच्या टिकेला खडसेंचं उत्तर म्हणाले,,,:
- “जर निर्मला सीतारामण यांना वेळ असेल, तर मी स्वत: फिरून त्यांना बारामती दाखवेन;” सुप्रिया सुळे
- “महाराष्ट्रातील जनता कोणाबरोबर आहे? हे दसऱ्याच्या दिवशी दिसेल”; शंभुराज देसाई