मुंबई : गेली काही दिवसात राज्यातील लसीकरणाचा वेग मंदावल्याचे पाहायला मिळत आहे. आता मुंबईत पुढील दोन दिवस लसीकरण केंद्र बंद राहणार आहेत. यासंदर्भात महापालिकेने ट्विट करत माहिती दिली आहे. मुंबईत 15 आण 16 तारखेला लसीकरण बंद असेल.
अरबी समुद्रात ‘तौत्के’ नावाचे चक्रीवादळ तयार होत आहे. हे चक्रीवादळ दिनांक 15 व 16 मे २०२१ रोजी मुंबईच्या नजिक येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे, याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत दोन दिवस लसीकरण बंद असेल. लसीकरणाविषयी पुढील माहिती आपल्याला लवकरच कळवण्यात येईल, असेही महापालिकेने सांगितले आहे.
मुंबईकरांनो,
आम्ही सूचित करू इच्छितो की १५ व १६ मे, २०२१ रोजी लसीकरण प्रक्रिया बंद ठेवण्यात येत आहे.
लसीकरणाविषयी पुढील माहिती आपल्याला लवकरच कळवण्यात येईल.#MyBMCVaccinationUpdate #WeShallOvercome #MyBMCUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 14, 2021
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवावी तसेच विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचाव कार्य करावे. विशेषत: पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सज्ज रहावे व मनुष्यबळ तसेच साधन सामुग्री तयार ठेवावी असे, त्यांनी सांगितले.
तसेच, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी महापालिकेच्या सर्व संबंधीत यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश यापूर्वीच दिले आहेत.
Read Also :
- ‘अशोकराव, आम्ही सत्ता तुमच्यासारखी चोरून आणली नाही’
- ‘चंद्रकांत पाटील यांना मानसिक उपचारांची नितांत गरज’
- चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट, मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सुचना
- ‘मराठा समाजासाठी 3 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करा’
- ‘कुठून हे नग मिळतात?’ भाजप नेत्याचा व्हिडीओ शेअर करत आव्हाडांची टीका