मुंबई : राज्यातल्या पुर्व मान्सूनच्या सरींनी मुंबई महापालिकेच्या नालेसफाईच्या दाव्यांचे पितळ उघडे पाडले आणि सगळीकडे मुंबईची कशी परंपरेप्रमाणे पुन्हा एकदा ‘तुंबई’ झाली, याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या.
दरम्यान, यावरून मुंबई महापालिकेची सत्ता असणाऱ्या शिवसेनेवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात असून, भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले आहे.
या पार्श्वभूमीवर, शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी एक अजब दावा केला असून, त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना, ‘केंद्र सरकारमुळेच मुंबईतल्या सखल भागांत पाणी साचले, असे म्हटले आहे.
‘गेल्या ३ दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने, मुंबईच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत आहे. हिंदमाता भागात पाणी साचण्यासाठी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी जबाबदार असून, ३ महिन्यांपासून या भागात तातडीने अंडरग्राऊंड ड्रेनेज टनल बसवण्याची परवानगी मागितली जात असूनही, ती दिली गेली नाही, त्यामुळे हे पाणी साचले आहे,’ असा आरोप त्यांनी केला आहे.
तसेच, मुंबई शहरात झालेल्या अतिवृष्टीसाठी जागतिक तापमानवाढ जबाबदार असून, शहरात सध्या सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे, मुंबईकरांनी गरजेशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Read Also :
- पवार, चव्हाण आम्हाला महत्वाचे नाहीत; पंतप्रधानांशी काय चर्चा झाली नीट जाहीर करावं; मेटेचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा चेहरा नवा…आता आम्हाला पार्थ पवारच हवा!
- वंचित आघाडी-संभाजीराजे मेतकूट जमल्यास, शिवशाहीला नाही ‘पेशवाई’ला फटका
- मंत्र्यांचे आजोबा-पणजोबाही वारीला जातात, सरकारने विचार करूनच निर्णय घेतलायं – भुजबळ
- नवाब मलिक यांचे मोठे विधान; भाजपविरोधात आघाडी करण्यास आम्ही घेणार पुढाकार