मुंबई : राज्यात आगामी काळात महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांची तयारी सध्या राजकीय पक्षांकडून जोरदार सुरू करण्यात आली आहे. यातच ओबीसी आरक्षणामुळे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकावर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीत नेमकं काय होणार त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा…“त्यांच्या मनात गद्दारीचं बीज आधीपासूनच पेरलेले”, तानाजी सावतांच्या दाव्यावर ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आज मेन्शन करण्याची शक्यता आहे. त्यानंतर सुनावणीची नवी तारीख निश्चित होईल. ९५ नगरपालिकांमधील ओबीसी आरक्षण तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंंबित निवडणुका या संदर्भात ही सुनावणी होणार आहे. गेल्या आठ महिन्यांपासून या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झालीच नाही.
हेही वाचा…“डंके की चोट पे…!” गुणरत्ने सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षासाठी रद्द
दरम्यान, मुंबई महानगर पालिकांसह ठाणे, नाशिक आणि पुण्यातील महानगरपालिकांची निवडणुक होणार आहे. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपने आतापर्यंत जोरदार तयारी केली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर ठाकरे गटाला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाकडून देखील मोठी तयारी करण्यात येत आहे.
Read also
हेही वाचा…“बाळासाहेब ठाकरेंच्या सभेला मैदानं खाली होती, पण आता..”, तानाजी सावंतांचं विधान, राजकारण तापणार
हेही वाचा…“तर १६ आमदार अपात्र ठरल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल”, मोठ्या नेत्याचा दावा, निकालाची उत्सुकता शिगेला
हेही वाचा…पुण्यातील भाजपचे खासदार गिरीश बापट यांची प्रकृती खालावली, रूग्णालयात दाखल
हेही वाचा…“एकही आरोप सिद्ध केल्यास आमदारकीचा राजीनामा देईन,” संजय शिरसाठांचं सुषमा अंधारे यांना आवाहन
हेही वाचा…हाजीर हो….! उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे अन् संजय राऊतांना उच्च न्यायालयाकडून समन्स