नागपूर : ईडीकडून शिवसेना नेते व परिवहनमंत्री अनिल परब यांना नोटीस बजावली गेली आहे. शिवाय, त्यांना ३१ ऑगस्ट रोजी ईडी कार्यलयात चौकशीसाठी हजर राहण्यास देखील सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, नारायण राणेंच्या अटकेच्या संदर्भातील परब यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यांनतर, त्यांना आता ईडीकडून नोटीस बजावण्यात आल्याने या ‘टायमिंग’ची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
मोठी बातमी : शिवसेना मंत्री अनिल परब यांना ED ची नोटीस, ठाकरे सरकारला मोठा धक्का
दरम्यान, या सगळ्यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून, “परब यांना ईडीकडून नोटीस मिळाली की नाही, याची आपल्याला कसल्याही प्रकारची माहिती नाही. पण ईडी असो कि सीबीआय, या तपास यंत्रणा त्यांच्या पद्धतीने आणि कायदेशीरपणेच काम करत असतात,” असे त्यांनी ठळकपणे म्हटले आहे. तसेच, त्यांनी अनिल देशमुख यांच्यावरील कारवाई संदर्भातही भाष्य केले.
नारायण राणे यांच्या दोन्ही मुलांना मारल्या शिवाय स्वस्त बसणार नाही; शिवसैनिकाच्या वक्तव्याने खळबळ
या प्रकारच्या खोट्या बातम्या पेरून काहीच उपयोग होणार नाही. आता थेट सीबीआयनेच यावर स्पष्टीकरण दिले आहे. महाविकास आघाडी सरकारकडून एफआयआर रद्द व्हावा, यासाठी जो खटाटोप चालला आहे.. त्याला अपयश आले आहे. प्रकरण कुठलेही असू दे, जे झालं पाहिजे ते सगळं कायद्यानेच व्हायला हवे, अशी आमची भूमिका आहे. हा काय कुणा एका व्यक्तीचा प्रश्न नसून, कायद्याचा प्रश्न आहे,” असं मत त्यांनी मांडलं आहे.
अनिल देशमुखांना क्लीनचीट मिळालेली नाही, चौकशी सुरुच आहे; सीबीआय’चा मोठा खुलासा
१०० कोटी खंडणी प्रकरणी मुख्य आरोपींपैकी एक असलेले, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयकडून क्लीनचीट दिली गेली असल्याच्या बातम्या रविवारी सकाळपासून सर्व प्रकारच्या माध्यमांत पसरल्या होत्या. यानंतर यावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात वाक्युद्ध सुरु झाले. त्यानंतर यावर सीबीआयने स्पष्टीकरण देऊन सांगितले; कि “कोणतीही क्लीन चिट दिली गेली नाही.” त्यामुळे, राज्यात पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष सुरु झाला असल्याचे दिसत आहे.
Read Also :
- “शुद्धीत येऊन बोला! ‘ते’ आदेश केंद्राचेच”, शंखनाद आंदोलनावरून वडेट्टीवारांनी भाजपला सुनावले
- मंदिरं उघडण्यासाठी भाजप आक्रमक; पुण्यात कसबा तर पंढरपुरात विठ्ठल मंदिरात कार्यकर्ते घुसले
- टल्ली लोक चालतात, तल्लीन भक्त नको? मुख्यमंत्री ठाकरे धर्मयुद्धासाठी तयार राहा; भाजप आक्रमक
- दरोडेखोर परमवीर सिंग यांना तात्काळ अटक करणं गरजेचं आहे; हसन मुश्रीफांचा आक्रमक पवित्रा
- १०० कोटी वसुलीत अनिल देशमुखांची भूमिका नसल्याचा सीबीआयचा अहवाल, मग कारवाई कुणाच्या इशाऱ्यावर?