नवी दिल्ली : भारत जोडो यात्रा काढण्याचा माझा उद्देश लोकांना भेटणे व त्यांना समजून घेण्याचा आहे. द्वेष पसरवण्यासाठी मी घराबाहेर पडलो नाही. गरीब जनतेला महागाई व बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. माझा त्यांना एकसंध करण्याचा प्रयत्न आहे. मी विचारधारेने डाव्या संघटनांशी सहमत नाही. असं काॅंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
“तेव्हा दोन तास मला गुंतवणुकदारांसाठी काढायला लागायचे पण आता…”; शरद पवार
आम्ही बिहार, गुजरात व बंगाललाही गेलो नाही. आमच्या यात्रेचा उद्देश भारताच्या एका टोकाहून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्याचा आहे. आमच्याकडे उत्तर प्रदेशाविषयी ठोस व्हिजन आहे. मी तेच म्हणेल, जे मागच्या पत्रकार परिषदेत म्हटले होते. माझी भूमिका स्पष्ट आहे. जे काही होईल, ते तुम्हाला लवकरच कळेल, माझे काम भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी संपवण्याचे आहे. असंही राहुल गांधी म्हणाले.
“ठाकरेंना गिधाड अन् गरूडामधलं फरक माहित नाही, अमित शहा हे गरूड आहेत”; भाजपचं प्रत्युत्तर
सोनिया गांधी परदेशातून परत आल्यानंतर राहुल गांधींशी त्यांची भेट झाली नाही. त्यामुळे उद्या भारत जोडो यात्रेला सुट्टी असल्याने रात्री म्हणजे 24 तारखेला सोनिया गांधी यांची भेट घेणार असून ते रात्रीच परत येणार असून ते लगेच भारत जोडो यात्रेला सुरूवात करणार आहेत. तसेच यावेळी प्रियंका गांधी देखील त्यांच्यासोबत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिवतीर्थावरील परवानगी ठाकरेंना नाकारली, अंधारे म्हणाल्या, “काल फक्त ट्रेलर होता, एवढ्यात घाबरलात ?”
दरम्यान, काॅंग्रेस निवडणुक समितीचे अध्यक्ष मधुसुदन मिस्त्री यांनी पक्षाच्या अध्यक्षपदासाठी गुरूवारी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार उमेदावारी दाखल करण्याची प्रक्रिया 24 ते 30 सप्टेंबरपर्यंत चालेल. त्यात एकाहुन अधिक नेत्यांनी उमेदवारी दाखल केली. तर 17 ऑक्टोंबर रोजी निवडणुक होईल तर 19 ऑक्टोबर रोजी निकाल घोषित होईल, दरम्यान राहुल गांधींनी अध्यक्ष निवडणुकीतील आपल्या भूमिकेवर कोणतेही भाष्य केले नाही. पण एका व्यक्तीकडे एकच पद राहिल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Read also
- उद्धव ठाकरेंंची दिवसेंदिवस ताकद वाढतेय; राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी सेनेत केला प्रवेश
- “माझे कुटुंब, माझी जबाबदारी, आम्ही फक्त चार राहू बाकी कोणीच नाही”; चंद्रशेखर बावनकुळे
- “उद्धव ठाकरेंनी कालचं भाषण दारू पिऊन केलंय”; अन् नारायण राणेंची जीभ घसरली
- “हिमंत असेल तर शिंदे गटातील आमदारांना भाजपानं पक्षात विलीन करावं”; भास्करराव जाधव
- “आज बोटं मोजताय, उद्या बोटं मोडाल, आदर देतोय, आदर घ्या…;” मनसेचा शरद पवारांवर निशाणा