मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या, नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीने जोर धरला आहे. यासाठी, रिपाईसोबतच अनेक समाजिक संघटना, तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. मात्र, नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव देण्यात येईल, असे सरकारकडून स्पष्ट केले गेले असून, सिडकोच्या संचालक मंडळाने, लोकभावनेला डावलून तसा प्रस्ताव मंजूर केला आहे.
हे पण वाचा, अखेर राज्य सरकारने नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाबद्दल घेतला मोठा निर्णय!
दरम्यान, यावरून आता राजकारण चांगलेच तापायला सुरुवात झाली असून, काही दिवसांपूर्वी ठाणे, पालघर, रायगड या परिसरात १० जून रोजी भू्मीपत्रांनी मानवी साखळी आंदोलन केले होते. त्यानंतर आता भूमिपुत्रांनी सिडकोला घेराव घालण्यासाठी २४ जून रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत, खासदार कपिल पाटील यांनी सांगितले, ‘आपला समाज एखादा विषय पकडतो, मात्र नंतर धरसोड करतो. परंतु, या आंदोलनात जो सहभागी असेल, तोच खरा भूमीपूत्र आहे. अशी भूमिका प्रत्येकाने घेतल्यावर या आंदोलनाला व्यापक स्वरुप येऊ शकते.’
हे पण वाचा, ‘बाळासाहेब आज असते, तर त्यांनीच विमानतळाला नाव नाकारले असते!’ – छगन भुजबळ
तसेच, ‘बाळासाहेबांचे नाव जेव्हा समृद्धी महामार्गाला दिले गेले. तेव्हा मॅच त्याला विरोध नव्हता. त्यामुळे, आता दि. बांच्या नावाला त्यांचा विरोध असण्याचे कारण काय? सिडकोने प्रस्ताव पारित देखील केला. ही सिडको आली कुठून? या सिडकोला भूमीपूत्रांनी जागा दिली आहे म्हणून सिडको आहे. अजूनही याबाबतची भूमिका आघाडी सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मांडलेली नाही. त्यामुळे त्यांची भूमिका स्पष्ट होताच, त्यांच्या पक्षातील देखील कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होतील,’ असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, ‘नवी मुंबई विमानतळाला इतर कोणा प्रतिष्ठित व्यक्तिचे नाव देण्याचा कोणताही प्रस्ताव आधी सरकराकडे आला नव्हता. त्यामुळे या विमानतळाला बाळासाहेबांचेच नाव देण्याचा प्रस्ताव सिडकोने मंजूर केला आहे. आम्हाला निश्चितच दि. बा. पाटील यांच्याबद्दल आदर आहे. त्यामुळे, नवी मुंबईतील अजून एका दुसऱ्या नव्या मोठ्या प्रकल्पाला त्यांचे नाव प्रकल्पग्रस्त कृती समितीने सूचवावे,’ असं आवाहन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत भूमिका मांडताना केले आहे.
Read Also :
- “सोनिया ‘मातोश्रीं’ची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत आहे”
- आता ओबीसी समाजही आक्रमक, छगन भुजबळांच्या निवासस्थानी ठरली आंदोलनाची दिशा
- ‘रामभक्तांची दिशाभूल करण्यासाठी रचण्यात आलेले हे राजकीय षडयंत्र’, ट्रस्टने फेटाळले भ्रष्टाचाराचे आरोप
- “ती” यादी राज्यपालांकडेच, मात्र आता ही यादी देणे शक्य नाही
- कोल्हापूरात उद्या मुक मोर्चा, कोणलाही उलट-सुलट बोलू नका – संभाजीराजे