पुणे : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा निवडून आलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा, पहिला विस्तार झाला. त्याची चर्चा अजूनही देशात सुरु आहे. यामध्ये ४३ नव्या आणि अनुभवी चेहऱ्यांचा समावेश केला गेला असून, काहींना बढती मिळाली आहे, तर जुन्या १२ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला गेला आहे. दरम्यान, या मंत्रीमंडळ विस्ताराआधी केंद्राने, सहकार मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि अमित शहा, या नवीन खात्याचे पहिले ‘सहकार मंत्री’ बनले. या पार्श्वभूमीवर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना, मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
लातूरमध्ये राष्ट्रवादीने, भाजप-काँग्रेसला दाखवली वेळ; लावले अनेक पदाधिरकारी गळाला
“केंद्रातल्या मोदी सरकारने, नवीन सहकार मंत्रालय स्थापन केली तर आहे, मात्र त्यांना सहकाराची ‘एबीसीडी’ अजिबात माहिती नाही. त्यामुळे, कदाचित सहकार क्षेत्राची व्यवस्था, पूर्णपणे उध्वस्त करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असावा. असंही आधीपासून ते, देशातील अनेक व्यवस्था उध्वस्त करत आहेतच, आता त्यांनी देशचं उध्वस्त करायचं ठरवलं असेल, तर काय करणार? केंद्रात खातेबदल झाले, नवीन मंत्री झाले, पण डबे कितीही बदललेले, तरी काही उपयोग नाही, इंजिन बदलणे गरजेच आहे, ते सध्या देशाच्या जास्त हिताचं आहे,” असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.
“मुंडे साहेबांना तर शपथही…” आणि गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीने, पंकजा मुंडे झाल्या भावुक
यावेळी त्यांनी, काँग्रेसमध्ये वाद नाही. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत, दिल्लीत त्यांच्या कामानिमित्ताने जात असतात. आजही तेच कारण असावे, फक्त सोबत नितीन राऊत गेले असतील,” असं म्हणत वादाच्या मुद्द्यावर बोलणे टाळले. “महामारीच्या परिस्थितीत २ दिवसांच्या अधिवेशनात, विधानसभा अध्यक्षची निवड केली जाणे, केवळ अशक्य होतं,” असं म्हटलं आहे.
“मला आणि कराडांना गोपीनाथ मुंडे यांनीच घडवलं, आम्ही दोघेही मुंडे साहेबांचेच कार्यकर्ते”- फडणवीस
काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढविणार का, यावर त्यांनी, “पुण्यात महापालिका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू आहे. स्थानिक नेत्यांशी बोलून त्याची चाचपणी सुरू आहे, नंतर योग्य वेळ आली की निर्णय घेऊ,” असं म्हणत त्यांनी स्वबळावर ठाम असल्याचा पुनरुच्चार केला. ओबीसींच्या भाजप विरोधात आहे. या अधिवेशनात जे झालं, ते भाजपच्या नेत्यांचं तोल सुटल्यानं, मात्र, आमच्या महाविकास आघाडीचं इंजिनपण आणि ड्रायव्हरपण चांगला आहे,” या शब्दांत त्यांनी भाजपवर घाबघत केला आहे.
“केवळ ५५ आमदारांत मुख्यमंत्री झाला, पिंपरी-चिंचवडचा महापौर ५० नगरसेवकांत होणार नाही?”
मोदी सरकारने सीबीआय आणि ईडीचं महत्व क्षुल्लक करून ठेवलं आहे आणि काँग्रेस, केंद्राने बनवलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात आहे. हा शेतकरी विरोधी कायदा, कुठल्याही परिस्थितीत राज्यात लागू करून दिला जाणार नाही. या जाचक कायद्यामुळे, कृषी व्यवस्था उद्धवस्थ करण्याचा भाजप प्रयत्न करत आहे. हा कायदा लागू करणे, म्हणजे ‘देश मुठभर लोकांना विकणे’ आहे आहे. त्यामुळे कायदा राज्यात कदापि लागू करून दिला जाणार नाही,”अशी स्पष्ट भूमिका त्यांनी या कायद्यांच्या पार्श्वभूमीवर घेतली आहे.
Read Also :
- पक्षात मी-मी चालत नाही, आधी राष्ट्र, पक्ष आणि शेवटी मी; ही भाजपची संस्कृती, पंकजाताईंचा रोख कुणाकडे?
- अँटिलिया स्फोटकं-मनसुख हिरेन हत्या प्रकरण : घडामोडींना वेग, तळोजा जेलमध्ये होणार वाझेची चौकशी
- आम्ही नाराज नाहीत, आमच्यावर मुंडे साहेबांचे संस्कार; पंकजा मुंडेंनी मौन सोडले
- काँग्रेसमध्ये राऊत-पटोले वाद उफाळला, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत थेट दिल्ली दरबारी दाखल
- मोठी बातमीः भीमा-कोरेगाव प्रकरणात शरद पवारांची साक्ष नोंदवणार; चौकशी समिती समन्स पाठवणार!