मुंबई : मी भाजपमध्ये खासदार असताना, माझादेखील फोन टॅप केला गेला असल्याची मला माहिती मिळत असल्याचं, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं असून, याबाबत त्यांनी राज्य सरकारकडे चौकशी करण्याची मागणी केली आहे.
२०१७ साली मी भाजपमध्ये खासदार असताना, अमजद खान नावाने हा फोन टॅप झाला असून, सोबतच्या चारही सहकाऱ्यांचे फोनदेखील टॅप झाल्याचे सांगितले जात आहे. मला अशा प्रकारे फोन टॅपिंग झाल्याची माहिती मिळत आहे. याबाबत सरकारने योग्य ती कारवाई करावी. असे सांगताना त्यांनी, २०१७ साली राज्यात कोणाचं सरकार होतं?,” असा सवाल देखील उपस्थित केला आहे.
तसेच, सरकारच्या मान्यतेशिवाय कोणाचेही फोन टॅप करता येत नाहीत. राज्यामध्ये गुजरातसारखेच राज्य आणण्याचा प्रयत्न केला जात होता. प्रत्येकाला त्यांचं व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे. कोणीही कोणाच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करू शकत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, भापचे नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी, नाना तेव्हा भाजपचे अधिकृत खासदार होते. त्यामुळे त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यांची अवहेलना होता कामा नये. राज्यातल्या एका पक्षाने दुसऱ्याच्या पक्षाच्या कोणत्याही नेत्याचे किंवा आपल्यादेखील कोणत्याही पक्षाच्या नेत्याचे फोन अशाप्रकारे टॅपिंग करू नये. याबाबत सरकारने ताबडतोब निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत करून चौकशी करावी. मी नानांच्या सोबत आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Read Also :
- राज्यातील आगामी महापालिका निवडणुका कोरोनामुळे लांबणीवर?
- “कॅबिनेटमध्ये भांड्याला भांडे लागले असेल, पण आमची भांडी काचेची नाहीत” संजय राऊत
- ठाकरे सरकारनेही मोदी सरकारच्या पाऊलावर पाऊल टाकावं, छत्रपती संभाजीराजेंनी केली मागणी
- अतुल लोंढेंची “चाय पे” टीका, म्हणाले चहामुळे आमच्याकडे…
- ‘राज्याचा आभासी कारभार करणाऱ्यांना, असले राजकारण शोभत नाही’