अमरावती : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गेल्या काही दिवसात आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. नाना पटोले सातत्याने आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे सांगत आहेत. यातच आता ‘वेळ आली तर तुमच्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अंगावरही जाऊ’, या वक्तव्यामुळे नाना पटोले पुन्हा चर्चेत आले आहेत.
नाना पटोले यांनी अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा मतदारसंघात सभेला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस नेत्या आणि मंत्री यशोमती ठाकूर यांचे कौतुक केले. सोबतच, अन्याय झाला तर मुख्यमंत्र्यांच्या अंगावरही जायला मागे पुढे पहात नाही, असे वक्तव्य त्यांनी केले.
नाना पटोले यशोमती ठाकूर यांचे कौतुक करत म्हणाले की, तुम्हाला मी विधानसभेत गेली अनेक वर्ष पहातोय. ह्या भागाच्या लोकांसाठी सातत्यानं भांडणारी रणरागिनी आम्ही पाहिली. वेळ आली तर तुमच्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अंगावरही जायला मागे पुढे पहात नाही. जे लीड आपल्याला मिळालं, त्यापेक्षा जास्त मतानं आपला उमेदवार ह्या भागातून निवडून यायला पाहिजे.
नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात निवडणुकाच निवडणूका असणार असल्याचे देखील यावेळी पटोले यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता चर्चेला उधाण आले आहे.
Read Also :
- ‘परदेशातील काळ्या पैशांचा खरा आकडा नरेंद्र मोदींकडे होता’
- ‘पायी वारीबाबत सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा होता’
- ‘मी राष्ट्रपती नियुक्त खासदार, चंद्रकांत पाटलांनी मला शिकवू नये’
- ‘प्रशांत किशोरांच्या नका लागू नादी, 2024 मध्ये पंतप्रधान बनणार आहेत मोदी’
- ‘…म्हणून महाराष्ट्रात पेट्रोल सर्वात महाग आहे’, पेट्रोलियममंत्र्यांनी सांगितले कारण