मुंबई : छ. संभाजीराजे यांनी आज पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. “नांदेड मध्ये आम्ही न बोलवता ५० ते ७० हजार लोकांचा जमाव जमला होता. त्यामुळे, सरकार दखल घेत नसेल, आवाज उठवायचा म्हटलं तर मी ते करू शकतो. नांदेड फक्त एक झलक होती. तीही नं सांगता ,आता सांगून बघू का? मग बघा. तेव्हा नांदेडला गर्दी जमली तशी गर्दी झाली तर, आम्ही जबाबदार नाही. सरकारला चालेल का?” अशा शब्दात त्यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.
राष्ट्रवादी स्वबळावर लढणार? मलिकांचं मोठं विधान; केली ‘मिशन ११४’ ची तयारी सुरु
तसेच, नांदेडमध्ये मराठा मुक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी, महामारीच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे, एकूण २१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यावरून, “गुन्हाच दाखल करायचा असेल, तर माझ्यावर करा! सामान्य-गरीब मराठा बांधवांवर का करता? समाजाच्या प्रश्नांसाठी एकत्र जमलेल्या मराठा बांधवांवर प्रशासनाकडून कोविडच्या नावाखाली गुन्हे दाखल केले गेले. राजकीय पक्षांना वेगळा आणि मराठा समाजाला वेगळ न्याय, असे का?”, असा संतापही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शिवसेना-काँग्रेसच्या मंत्र्यांवर राष्ट्रवादी नाराज? मलिकांनी स्पष्ट केले कारण
“अण्णासाहेब पाटील महामंडळाला १८८५ कोटी निधी वाटला असं हे अधिकारी सांगून फसवतात. हे पैसे सरकारने दिले नसून बँकांनी दिले आहेत. ते मागच्या सरकारचे आहेत. या सरकारने किती दिले आहेत, ते सांगावं. आत्ता त्यांनी जाहीर केलेले साडे १२ कोटीही मागच्या सरकारच्या काळातले आहेत. ते पत्रही मुख्यमंत्र्यांनी पाठवलेलं नसून, अधिकाऱ्यांनी लिहिलं आहे. फक्त पाठवायचं म्हणून हे उत्तर पाठवलं आहे,” असं सांगत त्यांनी राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांच्यावर आरोप केला आहे.
दाऊदला पाठवले तरी भीत नाही, मी घोटाळे उघडकीस आणणार – किरीट सोमय्यांनी ललकारले
“नवीन एक आयोग स्थापन केल्यावर आता परत आम्ही आणखी २ वर्षे थांबायचं का? सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध करावं लागेल, त्यासाठी काहीच केलं जात नाही. सांगितलं जात कायदेशीर अभ्यास करत आहोत, पण हे उत्तर आहे का? निवडून आलेल्या मुलांचा दोष काय? असा सवाल त्यांनी सरकारला केला. तसेच, वडेट्टीवार हे समाजद्वेषी आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज द्यावी, आणि विनायक मेटे प्रश्न मांडत असतात त्यांचं कौतुक आहे,” असंही संभाजीराजे म्हणाले.
Read Also :
- चिपी विमानतळ उद्घाटन, राणे म्हणाले मुख्यमंत्र्यांची गरज काय? भाजप नेते म्हणतात…
- माझ्यामुळे काही मंत्र्यांची झोप उडाली, ते भाईंची मदत घेताहेत – किरीट सोमय्या
- चिपी विमानतळ श्रेयवादावरून राजकारण तापलं, पुन्हा पाहायला मिळणार राणे-मुख्यमंत्री संघर्ष?
- विजय वडेट्टीवारांनी मंत्री पदाचा राजीनामा देवून हातभट्टी विकायचा धंदा टाकावा – भाजप
- बेळगावात मराठी माणसाचा नाही, संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव झाला – देवेंद्र फडणवीस