सिंधुदुर्ग – सिंधुदुर्गचे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. राणेंनी वेळोवेळी सत्तेसाठी गद्दारी केल्याने गद्दारीवर उपदेश देण्याचा त्यांना अधिकार नाही,अशा शब्दात नाईक यांनी राणेंना खडेबोल सुनावले आहे. नाईकांच्या या वक्तव्याने पुन्हा शिवसेना आणि राणे यांच्यातील संघर्ष पेटण्याची चिन्हे आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा? शरद पवारांच्या परबांना महत्वाच्या सूचना
काही दिवसांपूर्वी राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेळावे घेऊन भाजपच्या कार्यकर्त्यांना धमकावले होते. पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निवडणुकांमध्ये गद्दारी केल्यास सोडणार नाही बघून घेईन, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना फटकारले होते. यावरून नारायण राणेंनीच वेळोवेळी गद्दारी केली असल्याने गद्दारी या विषयावर कार्यकर्त्यांना धमकावण्याचा राणेंना नैतिक अधिकार नाही, असे नाईक म्हणाले.
राजकारणात नारायण राणेंनी सत्तेसाठी शिवसेनेबरोबर गद्दारी केली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्येही त्यांनी गद्दारी केली. त्यानंतर स्वतःचा स्वाभिमान पक्ष काढला . वर्षभरातच स्वतःच्या कार्यकत्यांबरोबर गद्दारी करून राणे ईडीची कारवाई टाळण्यासाठी आणि सत्तेसाठी भाजपचे कमळ हाती घेतले. हे पाहता राणेंनी त्या त्या पक्षातील अनेकांशी गद्दारी करूनच पदे मिळविली. त्यामुळे वेळोवेळी गद्दारी करणाऱ्या राणेंनी गद्दारी या विषयावर बोलू नये आणि कोणाला उपदेशही देऊ नये , असा टोला नाईक यांनी लगावला.
साताऱ्यातील राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक प्रकरणावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
नारायण राणेंना भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते साथ देत नाहीत. जपचे निष्ठावंत कार्यकर्ते राणेंच्या मुलांना स्वीकारत नाहीत, त्यामुळेच भाजपच्या कार्यकर्त्यांना धमकावून त्यांना आपल्या दाबावाखाली ठेवण्याचे काम राणे करीत आहे, असेही नाईक म्हणाले. तसेच राणे कुटुंबीय स्वतःच्या स्वार्थसाठी भाजपमध्ये दाखल झाले आहे.
Read Also :
- आागामी महापालिका निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढणार; नाना पटोलेंची घोषणा
- पुण्यात महाविकास आघाडीमध्ये धुसफूस; भाजपच्या निर्णयाला राष्ट्रवादीचा पाठिंबा
- ‘तुम्हीपण तुटेपर्यंत ताणू नका राजांनो’; अजित पवारांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन
- रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुरेश लाड यांनी दिला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
- शशिकांत शिंदे यांनी निवडणूक गांभीर्याने घ्यायला हवी होती – शरद पवार