मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता राज्यातील राजकारण तापताना दिसत आहे. खासदार संभाजीराजे विविध पक्षातील नेत्यांची यासंदर्भात भेट घेत आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आता भाजप नेत्यांकडून टीकास्त्र सोडले जात आहे.
संभाजीराजे ज्यांच्या दारी फिरत आहेत, त्यांनी काय केलं. शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी काय केलं ?, असा खोचक सवाल भाजप नेते नारायण राणे यांनी केला आहे. राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणासंदर्भात सांगणार का ?, असा सवालही त्यांनी यावेळी केली.
मराठा समाज्याला आरक्षण दिलं गेलं त्यावेळी भाजप सरकारनं दिलं. पण ठाकरे सरकार मराठा आरक्षणाबाबत किती गंभीर आहे. स्वतः उद्धव ठाकरे हे मराठा समाज्याला आरक्षण द्यावे या मताचे नसल्याचा नारायण राणेंनी केला.
याआधी शरद पवार आणि संभाजीराजेंच्या भेटीवरून निलेश राणे यांनी देखील जोरदार टीका केली. संभाजीराजेंच्या मनात काय भलतच दिसतयं. पवार साहेब व महा विकास आघाडी च्या जवळ जायचं असेल तर खुशाल जावं पण मराठा आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरू नका. राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही,” असा जोरदार हल्लबोल त्यांनी केला आहे.
Read Also :
- ठाकरे सरकारने गृह विलगीकरणाचा निर्णय बदलला, आमदार महेश लांडगेंच्या प्रयत्नांना यश
- शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री ठाकरेंची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये अर्धातास चर्चा
- ‘म्युकरमायकोसिसच्या मोफत उपचाराबाबतची सरकारची घोषणा फसवी’
- ‘भाजपाची पोलखोल करण्यात वेळ घालवण्यापेक्षा मराठा आरक्षण कसं मिळेल याचा सल्ला सरकारला द्या’
- ‘मालकाच्या कर्तृत्वाचे असे जाहीर पोतेरे करू नये’