चिपळूण : रायगडमधल्या महाडमध्ये डोंगरकडा कोसळून तब्बल ४४ लोकांना जीव गमवावा लागला. चिपळूण, खेडमधल्या पुराने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या सगळ्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज केंद्रिय मंत्री नारायण राणे कोकण दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते देखील सोबत होते.
माझ्या जनतेवर दुःखाचा डोंगर, जन्मदिन साजरा करू नका; वाढदिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे आवाहन
दरम्यान, या तिघांनीही आज चिपळूणच्या बाजारपेठेत जाऊन पाहणी केली. त्यानंतर नारायण पत्रकार परिषद घेऊन थेट ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्र्यांवरच हल्ला चढवला. “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यावर संकटाची मालिका सुरू आहे. हा त्यांचाच पायगुण आहे. ते आल्यापासून वादळं काय, पाऊस काय, कोरोना काय… सगळं चालूच आहे. कोरोना ही त्यांचीच देण आहे, ते सोबत कोरोना घेऊनच आले. त्यांचे पाय पांढरे आहेत का,” असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.
परळीत पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त मुंडे समर्थकांची बॅनरबाजी, मात्र भाजपच्या नेत्यांचे फोटो गायब
यावेळी, राणेंनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कृतीवर प्रचंड संताप व्यक्त केला. मी आणि दोन्ही विरोधी पक्षनेते चिपळूणमध्ये आलो, पण प्रशासन किती बेजबाबदार आहे. त्यांना नियम, प्रोटोकॉल माहीत नाही. आम्हाला भेटायला एकही अधिकारी आला नाही. सगळे अधिकारी कार्यालयात बसून होते. त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. त्याशिवाय मी तरी स्वस्थ बसणार नाही, या वर सांगणार आहे, या अधिकाऱ्यांना चिपळूणमध्ये ठेवू नका,” असा इशारा त्यांनी दिला.
मुख्यमंत्री घटनेच्या चौथ्या दिवशी का हजार झाले…
मुख्यमंत्री चौथ्या दिवशी कोकणात का आले, हे सांगताना त्यांनी, “काल सं. ६:३० ला माझा फॅक्स आला. मी कोकणात येत असल्याचं त्यांना कळवलं होतं. त्यानंतर त्यांनी हा कार्यक्रम तयार केला. त्याआधी हॉस्पिटलमध्ये दाखल असल्यासारखे ते मातोश्रीच्या बंद दाराआड दाखल होते. आज सकाळी त्यांना सोडण्यात आलं आणि ते थेट इथे आले. काय मुख्यमंत्री? कसली संवेदना? त्यांनी लगोलग यायला हवं होतं. यंत्रणा हलवायला हवी होती. पण या राज्यात मुख्यमंत्री नाही ना प्रशासन नाही,” असा घणाघात त्यांनी केला आहे.
आढावा बैठकीनंतर पूरग्रस्त भागासाठी, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला मोठा निर्णय
राज्याचं बजेट चार-साडेचार लाखांचं, तरीही मदत देता येत नाही.
काय केंद्र-केंद्र म्हणताय. राज्याचं बजेट चार-साडेचार लाखांचं आहे. तरीही यांना मदत देता येत नाही. केंद्राकडे मदत मागता, तेव्हा केंद्र सरकार देतं, म्हणूनच आज मुख्यमंत्र्यांनी केंद्राचं कौतुक केलं आहे. राजकारण ज्याला करता येत नाही, त्याच्याशी आम्ही राजकारण करत नाही. आम्ही आमच्या तोडीच्या लोकांशी राजकारण करतो,” अशी बोचरी टीका त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.
एकदा शेतकऱ्यांच्या धर्तीवर कर्जमाफी द्या, पुन्हा कधीच भीक मागणार नाही! जगण्यासाठी त्यांनी जोडले हात
दरम्यान, भेटीनंतर व्यापाऱ्यांनी नारायण राणे यांना गराडा घातला आणि आपलं गाऱ्हाणं मांडलं. “दादा, तुम्ही कोकणाचे दैवत आहात. तुम्हीच आम्हाला न्याय देऊ शकता,” असं ते म्हणाले, यांनतर राणेंनीही सर्वोतोपरी मदत करण्याचं आश्वासन देत, “तुम्ही तुमच्या मागण्यांचं काही निवेदन तयार केलं आहे का? नसेल तर ३ मागण्यांचं निवेदन तयार करा. उद्या सोमवार आहे. हे निवेदन मला फॅक्स करा. आम्ही आमच्या लेव्हलला तुम्हाला मदत मिळवून देऊ,” असा धीर त्यांनी व्यापाऱ्यांना दिला.
Read Also :
- “आमचे आई-वडील तुम्ही आहात, आम्हला काहीही करून जगवा…” चिपळूणकरांनी मुख्यमंत्र्यांसमोर फोडला टाहो!
- ‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय’, निवेदन पाहून अजितदादा भडकले
- चांगल्या-वाईट कामचं प्रशस्तीपत्रं राहू द्या, राजकारण आणि टीका सोडून सध्या पुनर्वसन महत्त्वाचं
- पुन्हा एक हात मदतीचा: कोकणवासीयांसाठी आमदार महेश लांडगेंचे आवाहन
- तळीये दरड दुर्घटना : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत स्थानिक सांगतील तिथे पक्की घरे बांधून देणार- नारायण राणे