दिल्ली : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ४ दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पंतप्रधानांपासून गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष नड्डा, तसेच राज्यातील नवीन केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेणार आहेत. दरम्यान, आशिष शेलार यांनी अमित शहांची गुप्त भेट घेतल्यानंतर तातडीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाल्याने आणि या दोन्ही नेत्यांनी स्वतंत्रपणे केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केल्याने, राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं.
भाजपत अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाने गाठले टोक, शहर भाजपची टीम दिल्ली दरबारी दाखल
या सगळ्या पार्श्वभूमीवर आज पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारले असता, ‘मला माहित नाही आणि अशा बातम्यांची काळजी करण्याची मला गरज वाटत नाही”, असं उत्तर दिलं. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नारायण राणेही होते. त्यांनी यावर भाष्य करताना, “सध्या पक्षात अशी कोणतीही चर्चा नाही. तुम्ही पत्रकारच या चर्चा काढत आहात. दादा दिल्लीत माझ्या अभिनंदनासाठी आले आहेत. यात कसलं राजकारण”, असं म्हटलं.
२०२४ ला आमचं एकच इंजिन असणार; देवेंद्र फडणवीस यांच मोठं विधान
तसेच, ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना, “सत्तारुढ पक्षाने काहीच केलं नसल्यामुळे भाजपवर हेतुपरस्पर टीका केली जात आहे. राज्य सरकारकडे लोकांना सांगण्यासारखं काही नाही. आता १६ ऑगस्टनंतर मी राज्यात जाणार आहे. महिनाभरापासून त्यांचे वाभाडे काढले नाहीत. त्यांचं जे काही राज्यात सुरु आहे, ज्या पद्धतीने ते राज्याला अधोगतीकडे नेत आहेत. त्यावर मी लोकांना जागृत करणार आहे आणि केंद्रात राज्याला दिल्या जात असलेल्या न्यायाबद्दलही माहिती देणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
शिवसेनेच्या मुखपत्रातून फोडला गेला राजकीय बॉम्ब, अजून एका ठाकरेंच्या राजकीय प्रवेशाचे संकेत?
यावेळी, “राज्यात आल्यानंतर पुन्हा एकदा कोकण दौरा करेन. मागच्या वेळी माझ्या दौरा झाला, तेव्हा आमच्या मंत्र्यांनी ७०० कोटी रुपयांची मदत केली आणि मुख्यमंत्री फक्त १० हजार रुपयांची मदत करतात”, असा संतापात सवाल करत त्यांनी, “आता लोकांनी ते पैसे पिंपात टाकले असतील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने ते फुगून बाहेर येतील”, अशी ठाकरे सरकारची खिल्ली त्यांनी उडवली.
Read Also :
- शिवसेना पर्वती मतदार संघाच्या आंदोलनाला अखेर यश; जनता वसाहत मधील लसीकरणाला येणार वेग
- “पुण्याचा विकास फडणवीसांच्या सवडीनुसार नाही तर अजित पवारांच्या गतीने होणार”, चाकणकरांचा टोला
- कॉलेजनंतर आता हॉटेलवर ईडीची छापेमारी, समन्स बजावूनही गैरहजर राहत असल्याने कारवाई केली जात असल्याची चर्चा
- “ही नरेंद्र मोदींची पत्रकार परिषद”, पंतप्रधान मोदींवर काँग्रेसची बोचरी टीका
- मिसेस फडणवीसानंतर आता मिस्टर फडणवीस; पुणे मेट्रोच्या श्रेयासाठी मोदींच्या नावाची कुरघोडी?