अमरावती : लव्ह जिहादच्या नावाखाली 19 वर्षीय मुलीचा अमरावती येथील रूक्मिणी नगर परिसरातून अपहरण गेल्याची तक्रार देण्यात आली. त्यानंतर नवनीत राणा आणि काही हिंदुत्ववादी संघटनांनी पोलीस ठाण्यासमोर तणावाचे वातावरण निर्माण केले. याप्रकरणाची सविस्तर चौकशी केल्यानंतर पीडित मुलगी स्वत; पळून गेल्याने आणि तिच्यासोबत कुणी नसल्याचं पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी सांगितलं. त्यानंतर नवनीत राणांनी यांनी आयुक्त आरती सिंह यांना धमकावले असल्याची माहिती देखील समोर येत आहे. यावर आता काॅंग्रेसने एक ट्विट करत नवनीत राणांची हवाच काढून टाकली आहे.
“जनता तुमच्या ५० पैकी ४५ आमदारांचा नक्की पराभव करणार”; राष्ट्रवादीचा शिंदेंवर निशाणा
या संपुर्ण प्रकरणानंतर पीडित मुलींनी माध्यमांसमोर येत आपली बाजू मांडली. घरातूून माझ्या मर्जीने निघून गेली होती. तसेच याप्रकरणाचा आणि लव्ह जिहादचा काहीही संबंध नाही, फक्त माझी बदनामी करण्यासाठी हे सर्व करण्यात आलं असल्याची प्रतिक्रिया पीडित मुलींनी दिली आहे. त्यानंतर उताविळपणा, प्रकाश झोतात यायची हौस आणि सत्तेची हवा डोक्यात गेली की अशी तोंडघशी पडायची वेळ येते. नवनीत राणांनी जो काही धिंगाणा पोलीस कार्यालयात केला आणि त्या मुलीची हकनाक बदनामी केली. त्यासाठी नवनीत राणांनी जाहीर माफी मागितलीच पाहिजे, असं काॅंग्रेसने म्हटलं आहे.
“पंतप्रधान मोदींनी नारायण राणेंचा राजीनामा घेऊन मोकळे सोडले पाहीजे”
प्रशासनामध्ये असे काही अधिकारी आहेत ते राजकीय नेत्यांप्रमाणे आपल्या वर्दीचा गैरवापर करीत आहे. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन माझं काम मी इमानदारीनं पार पाडलं. तीन तास पीडित मुलगी माझ्याजवळ रडत होती. तिला तिच्या आईवडिलांकडे सोपवलं. त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. परंतु नवनीत राणा कुणालाही घाबरणार नाही, अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी दिली.
Read also
- “13 व्या वर्षी घाणेरड्या पिक्चरमध्ये काम केलं, तिच्यावर आम्ही घरंदाज बायका बोलणार नाही”; किशोरी पेडणेकर
- “शहाजी पाटलांनी माझ्याकडे यावं, त्यांना मातोश्रीवर चांगली खुर्ची देतो”
- “सांग सांग भोलानाथ हा बालिश प्रश्न शेलारांनी मुनगंटीवारांना विचारला पाहिजे”; सेनेचं प्रत्युत्तर
- “आरती सिंग दर महिन्याला वसुली करून पैसे ठाकरेंपर्यंत पोहोचवायच्या”; रवी राणांचा गंभीर आरोप
- पिस्तुल काढणं, सोडून द्या…अन्..”; आदित्य ठाकरेंचा वेदांत प्रकल्पावरून शिंदेंवर निशाणा