मुंबई – राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याच्या अनेक तारखा भाजपच्या नेत्यांकडून येत आहेत. त्याच दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं, मार्च महिन्यात मविआ सरकार कोसळून महाराष्ट्रात भाजपचं सरकार येणार. नारायण राणे यांनी केलेल्या या विधानानंतर अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांचा एकत्रित फोटोही व्हायरल झाला. यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली. यावर राष्ट्रवादीने स्पष्टीकरण देत तो फोटो मॉर्फ केलेला असल्याचं सांगितलं. मविआ सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार तसेच भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांची पुन्हा घरवापसी होणार असल्याचंही म्हटलं आहे.
कोल्हापुरातील आगामी राजकीय समीकरणे घडणार महाडिक विरुद्ध पाटील लढतीतून
नवाब मलिक म्हणाले, शरद पवार, प्रफुल्ल पटेल हे काल दिल्लीला पार्लमेंटच्या डिफेन्स कमिटी मीटिंगसाठी गेले होते. दरम्यान नारायण राणे यांचं वक्तव्य आलं की, मार्च महिन्यात आम्ही सरकार बनवणार. नारायण राणे यांच्या वक्तव्यनंतर एक पॉर्फ फोटो सोशल मीडियात व्हायरल करण्यात आली. ज्यात अमित शहा शानमध्ये बसले आहेत आणि शरद पवारांचा ज्या प्रकारे फोटो दाखवण्यात आला आहे तो अपमानित करण्यासाठी मॉर्फ फोटो होता. भाजपच्या आयटी सेलचा फर्जीवाडा जास्त वेळ चालणार नाही.
सरकार पाच वर्षे पूर्ण करणार, देवेंद्रजी वारंवार भविष्यवाणी करण्यात येत आहे. चंद्रकातं पाटील स्वप्न पाहून उठत राहिले. आता नारायण राणे… 1999 मध्ये मुख्यमंत्रिपद गेलं आणि त्या पदासाठीच ते काँग्रेसमध्ये आले. त्यानंतर भाजपत आले. त्यानंतर ते प्रत्येक वर्षी नवस करत आहेत. बोकड, कोंबड्या कापण्याचा प्रकार ते करत आहेत परंतु अजूनही नवस पूर्ण झालेला नाही. त्यांनी लक्षात घ्यावं ही सरकार दिवसेंदिवस भक्कम होत चाललेले आहे असंही नवाब मलिक म्हणाले.
ट्रक ड्रायव्हर बनून भाजपा आमदाराने केलं स्टिंग ऑपरेशन; कन्नड घाटातील पोलिसांच्या वसुलीचा पर्दाफाश
नवाब मलिक पुढे म्हणाले, त्यांना हे ही सांगतो लवकरच भाजपमध्ये असणारे अनेक आमदार आता पुन्हा स्वगृही परतणार आहेत. भाजप हताश आहे. एनसीपी, काँग्रेसमधून भाजपमध्ये जे गेले होते ते आता घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस, एनसीपीतून भाजपमध्ये गेलेल्यांना रोखण्यासाठी सरकार पडणार असल्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत.
Read Also :
- नवाब मलिक यांची भूमिका ड्रग माफियांसाठी फायदेशीर ठरली; निलेश राणेंचा सनसनाटी आरोप
- मार्च एप्रिलमध्ये भाजप-शिवसेनेचे राज्यात सरकार स्थापन होईल – रामदास आठवले
- एसटी संप फुटला आहे या निव्वळ अफवाच; संजय राऊत, शरद पवारांविरोधात सदावर्तेंचा हल्लाबोल
- संप मागे घेतला तरच एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ करणार; अनिल परबांचा कामगारांना इशारा
- संपाचा हट्ट जर कायम असेल तर नेत्यांनी कर्मचाऱ्यांच्या रक्षणाची जबाबदारी घ्यावी – संजय राऊत