मुंबई : एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यातील संघर्ष संपता संपत नाही अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नवाब मलिक आणि वानखेडे हे एकमेकांवर सातत्याने आरोप करत आहेत. नवाब मलिक रोजच्या रोज वानखेडेंच्या विरोधात पुरावे गोळा करून त्यांना अडचणीत आणत आहेत.
‘तुम्हीपण तुटेपर्यंत ताणू नका राजांनो’; अजित पवारांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन
नवाब मलिक जे काही आरोप ट्विटरच्या माध्यमातून करत आहेत त्याला विरोध करावा म्हणून समीर वानखेडेंच्या वडिलांनी न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र न्यायालायने याबाबत मलिक यांच्या बाजूने निर्णय दिला आहे.
पुण्यात महाविकास आघाडीमध्ये धुसफूस; भाजपच्या निर्णयाला राष्ट्रवादीचा पाठिंबा
वानखेडे कुटुंबीयांविरोधात सार्वजनिक वक्तव्य किंवा ट्विट करण्यास सरसकट मनाई करणारा अंतरिम आदेश देण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट नकार दिला आहे. सकृद्दर्शनी नवाब मलिक यांनी केलेले ट्विट्स हेद्वेषातून व पूर्ववैमनस्यातून करण्यात आले. तथापि, वानखेडे हे सरकारी अधिकारी आहेत आणि नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्याविरोधात केलेले ट्विट हेएनसीबी विभागीय संचालकाच्या सार्वजनिक कर्तव्यांशी निगडीत आहे. त्यामुळे मंत्र्यांना वानखेडे यांच्याविरोधात बोलण्यास पूर्णपणेमनाई करू शकत नाही, असे न्या.माधव जामदार यांच्या एकलपीठाने स्पष्ट केले.
आागामी महापालिका निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढणार; नाना पटोलेंची घोषणा
आज पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी वानखेडेंच्या विरोधात पुरावा ट्विटवर टाकून खळबळ माजवली आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या आईच्या मृत्यूच्या दाखल्याचे फोटो शेअर करत ‘आणखी एक फर्जीवाडा ‘ असा कॅप्शन त्या फोटोला दिला आहे. अंतिम संस्कारांसाठी मुस्लिम आणि सरकारी दस्तऐवजी हिंदू? धन्य हे ज्ञानदेव दाऊद असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे. मलिक यांनी ट्विटरच्या माध्यमातून झईदा ज्ञानदेव यांचे मृत्यचे नोंदणीपत्र शेअर केले आहे.यातील एक पत्र मुंबई महापालिकेतील आहे तर दुसऱ्या प्रमाणपत्रात झईदा यांचा उल्लेख हिंदू असा करण्यात आलेला आहे. मात्र दोन्ही प्रमाणपत्रांवर झईदा यांच्या पतीचा उल्लेख ज्ञानदेव वानखेडे असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे.
Read Also :
- मोठी बातमी: आझाद मैदानावरील एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन मागे, सताभाऊ खोत यांची घोषणा
- ३२ जिल्ह्यांतील १०५ नगरपंचायतींच्या निवडणुकांचा रणसंग्राम: २१ डिसेंबर रोजी होणार मतदान
- रविकांत तुपकरांच्या अन्नत्यागाला अखेर यश; शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारने घेतले ९ निर्णय
- अखेर एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा; परिवहनमंत्री अनिल परब यांनी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा
- नारायण राणेंनी सत्तेसाठी गद्दारी केली; शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप