मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजी-माजी आमदारांची आज बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी प्रत्येक मतदारसंघाचा त्यांच्याकडून आढावा घेतला. मात्र, या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून काँग्रेस-शिवसेनेच्या पालकमंत्र्यांविरोधात विरोधात नाराजीचा सूर उमटला असल्याचे आणि राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीलाच शत्रू मानत असल्याची खंत व्यक्त केली असल्याची माहिती समोर येत आहे.
“तुम्ही मराठी माणसाला सत्तेसाठी वाऱ्यावर सोडलं,” राऊतांवर भाजपचा पलटवार
दरम्यान, यावर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली असून, ‘तीन पक्षाचं सरकार असल्याने, प्रत्येक पक्ष कधी कधी आपल्याच आमदाराला झुकतं माप देतो, हेच राज्यात २ पक्षांचं सरकार असतं तर अजून वेगळं घडलं असतं. प्रत्येक वेळी प्रत्येकाचेच प्रश्न सुटू शकतात असे नाही, मात्र आजच्या केलेल्या तक्रारींचे समाधान करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल,” असं त्यांनी सांगितलं.
बाप हा बापच असतो, पण तो आयत्या बिळावरचा नागोबा नको – विनायक राऊत
तसेच, संबंधित स्थानिक माजी आमदार आणि विद्यमान आमदारांची कामे होत आहेत की नाही, यात राष्ट्रवादीचे मंत्री आता लक्ष घालतील आणि कामे होत नसतील तर का होत नाहीत? हे पहिले जाईल. तसेच, जिथे आमचा पालकमंत्री आहे, तिथेही इतर पक्षांकडून अश्या तक्रारी येऊ शकतात. त्यामुळे अश्या सगळ्यांच्याच तक्रारी एकमेकांबद्दल असणं सहाजिक आहे. त्यामुळे, हा काही मोठा प्रश्न असं आम्ही मानत नाही”, असं ते म्हणाले.
बेळगावात मराठी माणसाचा नाही, संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव झाला – देवेंद्र फडणवीस
दुसरीकडे, महाविकास आघाडी सरकारकडून सातत्याने राज्यतलं सरकार स्थिर असून ते ५ वर्षांचा कालावधी पूर्ण करेल असा दावा केला जात आहे. मात्र या तिन्ही पक्षातील समन्वयाचा असलेला अभाव कित्येक वेळा दिसून आला आहे. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी पक्षाने ही बैठक ठेवली होती. या बैठकीत राज्यातील आगामी निवडणुका, निवडणुकांची रणनिती, ओबीसींचं राजकीय आरक्षण या विषयांवर चर्चा झाली असल्याचे देखील मलिक यांनी सांगितले.
Read Also :
- दाऊदला पाठवले तरी भीत नाही, मी घोटाळे उघडकीस आणणार – किरीट सोमय्यांनी ललकारले
- चिपी विमानतळ उद्घाटन, राणे म्हणाले मुख्यमंत्र्यांची गरज काय? भाजप नेते म्हणतात…
- माझ्यामुळे काही मंत्र्यांची झोप उडाली, ते भाईंची मदत घेताहेत – किरीट सोमय्या
- चिपी विमानतळ श्रेयवादावरून राजकारण तापलं, पुन्हा पाहायला मिळणार राणे-मुख्यमंत्री संघर्ष?
- विजय वडेट्टीवारांनी मंत्री पदाचा राजीनामा देवून हातभट्टी विकायचा धंदा टाकावा – भाजप