मुंबई : राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये आलेल्या अतिवृष्टीने हाहा:कार उडाला आहे. यामुळे आत्तापर्यंत १६४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १०० जण अजूनही बेपत्ता आहेत. ९०,००० जणांचे स्थलांतर केले गेले असून, निसर्गाच्या या प्रकोपात तब्बल २५ हजार ५६४ जनावरं दगावली आहेत. मात्र, पूरामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रायगड या ५ जिल्ह्यांतील शेतकरी, कष्टकरी, उद्योजकांचं सर्वाधिक नुकसान झालं आहे.
राज्यपालांकडून तळीये गावची पाहणी; मदतीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी, “कोणत्याही नेत्यांनी प्रसंगावधान राखावं. मी देखील आता दौऱ्यावर जात नाही. आपल्यासाठी सर्व यंत्रणा फिरवावी लागते, जे की अशावेळी योग्य नाही. त्यामुळे कामात अडथळा येतो. दौऱ्याने जनतेला धीर मिळतो हे कितीही खरं असलं तरी, त्यामुळे शासकीय यंत्रणेचं काम वाढतं आणि ते होऊ नये, म्हणून ज्यांचा या भागाशी संबंध नाही, त्यांनी दौरे टाळावेत,” असं आवाहन त्यांनी केलं आहे.
तसेच त्यांनी, “५ जिल्ह्यांत सर्वाधिक नुकसान झालं आहे. आता राज्य सरकार त्यांच्या कार्यक्रमानुसार काही तातडीची मदत करेल आणि २ दिवसांत संपूर्ण राज्याचा आढावा घेतल्यानंतर राज्य सरकार कडून आणखी मदत जाहीर केली जाईल,” अशी माहिती देत, “राज्यपाल आपत्तीग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर जात आहेत. त्यांचे केंद्राशी चांगले संबंध आहेत, त्यामुळे त्यांनी केंद्राकडून राज्याला जास्त मदत आणावी,” अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात; २ जण गंभीर जखमी
त्यामुळे, आता सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यातील पूरपरिस्थितीचा एक जुजबी आढावा घेतल्यांनंतर आणि अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यांनतर, तातडीने लागेल ती सर्वप्रकारची मदत आणि सहकार्य शासनाकडून केले जाईल, आणि यंत्रणांना वेगाने कामाला लावले जाईल, तसेच या राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता लवकरात लवकर होईल आणि आस्मानी संकटाने पुन्हा एकदा होरपळून निघालेल्या या लोकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
Read Also :
- सोशल मीडियाचा कमी वापर अन् निवडणुकीच्या तयारीला लागा; राज ठाकरेंनी टोचले कान
- “या परिस्थितीत महाराष्ट्रात आलात तर…”, संजय राऊतांनी केंद्रातल्या मराठी मंत्र्यांना दिले आव्हान!
- दोन दिवसात पूरग्रस्तांना अडीच कोटींच्या साहित्याचं वाटप करणार; शरद पवारांची घोषणा
- ‘जनता समोर येऊन राग व्यक्त करू लागल्याने शिवसेना हादरलीय’, नारायण राणे यांची टीका
- लसीकरण केंद्रांवर बॅनरबाजीवरून काँग्रेस-भाजप आमनेसामने, नाना पटोलेंचा थेट आयुक्तांना फोन