मुंबई : राज्यात उद्भवलेल्या अभूतपूर्व पूर परिस्थितीचा आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीचा, राज्यातील सत्ताधारी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांनी आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी, तसेच काही दिवसांपूर्वी राज्यातून केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेले नारायण राणे यांच्यासोबत दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्ष नेत्यांनीही आढावा घेतला.
पूरग्रस्त भागाशी संबंध नसलेल्या नेत्यांना, पवारांनी केले कळकळीचे आवाहन
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी, “मी आता दौऱ्यावर जात नाही. कारण आपल्यासाठी सर्व यंत्रणा फिरवावी लागते, जे की अशावेळी योग्य नाही. त्यामुळे कामात अडथळा येतो, शासकीय यंत्रणेचं काम वाढतं आणि ते होऊ नये, म्हणून ज्यांचा या भागाशी संबंध नाही, त्यांनी दौरे टाळावेत,” असं आवाहन केलं.
राज्यपालांकडून तळीये गावची पाहणी; मदतीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन
दरम्यान, त्यांच्या या आवाहनाला असहमती दर्शवत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना, “त्यांनी जे आवाहन केलं, त्यामागचा अर्थ समजून घेतला तर लक्षात येतं की, विनाकारण आणि अनावश्यक दौरे करणाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. मी तर विरोधी पक्षनेता आहे. एकतर आम्ही जातो तेव्हा शासकीय यंत्रणा फारशी तिथे नसतेच. कारण तसा जीआरच काढलेला आहे, पण निदान आमच्या जाण्याने ती यंत्रणा जागी होते आणि कामाला तरी लागते,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी त्यांनी, “राज्यपालांचा दौरा हा राष्ट्रपतींच्या सूचनेनुसार असून, त्यांनी ४ प्रमुख पक्षांच्या एकेका आमदार किंवा खासदाराला बोलावलं होतं. मात्र, सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी राज्यपालांसोबत येण्यात असमर्थता दर्शवली. का ते मला माहिती नाही. दरम्यान, आज मुंबई भाजप आणि भाजयुमोच्या वतीनं, कोकणात काही जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली. त्यात घरगुती वापराच्या वस्तू, सॅनिटरी पॅडपासून सगळं असल्याचं त्यांनी सांगितलं.
कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात; २ जण गंभीर जखमी
राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये आलेल्या अतिवृष्टीने हाहा:कार उडाला असून, यामुळे आत्तापर्यंत १६४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १०० जण अजूनही बेपत्ता आहेत. ९०,००० जणांचे स्थलांतर केले गेले असून, निसर्गाच्या या प्रकोपात तब्बल २५ हजार ५६४ जनावरं दगावली आहेत. मात्र, पूरामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रायगड या ५ जिल्ह्यांतील शेतकरी, कष्टकरी, उद्योजकांचं सर्वाधिक नुकसान झालं आहे.
Read Also :
- “या परिस्थितीत महाराष्ट्रात आलात तर…”, संजय राऊतांनी केंद्रातल्या मराठी मंत्र्यांना दिले आव्हान!
- दोन दिवसात पूरग्रस्तांना अडीच कोटींच्या साहित्याचं वाटप करणार; शरद पवारांची घोषणा
- ‘जनता समोर येऊन राग व्यक्त करू लागल्याने शिवसेना हादरलीय’, नारायण राणे यांची टीका
- लसीकरण केंद्रांवर बॅनरबाजीवरून काँग्रेस-भाजप आमनेसामने, नाना पटोलेंचा थेट आयुक्तांना फोन
- …..म्हणून चढला मंत्र्यांसमोरच भास्कर जाधवांचा पारा