जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील राजकीय ओबीसी आरक्षण, सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर, भाजपकडून रस्त्यावर उतरुन जेल भरो आणि चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. यावेळी फडणवीसांनी, “ओबीसी आरक्षणाचा मारेकरी काँग्रेसच आहे,” असं म्हणत, “माझ्या हातात पुन्हा सूत्रं दिलीत, तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन, नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन,” अशी सिंहगर्जना केली.
यावर, आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली असून, जळगावमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी, “फडणवीस नेहमी अशा प्रकारच्या घोषणा करतात. वेगळा विदर्भाच्या मुद्द्यावर, “आपण लग्न करणार नाही”, अशी भीष्मप्रतिज्ञा त्यांनी घेतली पण, त्यांनी लग्न केले. पुराणात देखील, विश्वामित्राने ब्रम्हचर्य भंग करून, मेनकेशी लग्न केले, हा तोच प्रकार आहे”, अशी टीका त्यांनी केली.
“त्यांनी, राष्ट्रवादीशी युती करणार नाही, सांगितले होते. पण केली. आत्ता देखील ते सत्ता दिली तर आरक्षण मिळवून देऊ म्हणत आहेत, पण दिली तर मदत करणार नाहीत. त्यामुळे त्यांनी संन्यास घेऊ नये, ५ वर्ष विरोधक म्हणून सरकारला सल्ला द्यावा,” असा सणसणीत टोला त्यांनी फडणवीसांना लागावला आहे.
टीकेचं विष प्राशन करुन ओबीसींना आरक्षण मिळत असेल, तर आमची तयारी आहे; पंकजा मुंडे म्हणतात…
“ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणवीसांची भूमिका दुटप्पी आहे. त्यांनी गेल्या निवडणुकीच्या तोंडावर, आरक्षणाचा अध्यादेश काढला, पण ती फसवणूक होती. जनगणनेचा डाटा उपलब्ध होत नाही, तोवर अध्यादेशाला काय महत्त्व? फडणवीसांना हे माहित होतं. अजूनही केंद्र सरकारकडून डाटा आणला, तर राज्य सरकार त्यावर काम करू शकेल, वेळ गेलेली नाही. पण त्यांना तो केंद्राकडून मिळूही द्यायचा नाहीये आणि ओबीसींचे आम्हीच पाठीराखे असे म्हणायचे आहे, ही दुटप्पी भूमिका आहे,” असा घणाघात त्यांनी केला आहे.
Read Also :
- वडेट्टीवार म्हणाले, “ओबीसी असल्याने महसूल खातं मिळत नाही”, थोरात म्हणतात…
- “वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यँत लग्न करणार नाही, फडणवीस म्हणाले होते, त्याचं काय झालं?”
- मी फडणवीसांना सन्यास घेवू देणार नाही, कारण…- संजय राऊत
- ओबीसी आहोत म्हणून आपल्याला कमी दर्जाची मंत्रिपदं मिळतात; विजय वडेट्टीवारांचे गंभीर आरोप
- ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न म्हणजे, भाजपचे पाप; सचिन सावंत म्हणतात…