मुंबई : ‘स्वबळावर लढून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करणे यात चुकीचे काय आहे? भाजप व काँग्रेससारखे पक्ष त्या दिशेने तयारी करीत आहेत हे चांगलेच झाले. आता महाराष्ट्रात राहता राहिले शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच पक्ष. सगळेच स्वबळावर लढत असतील तर या दोन प्रमुख पक्षांना महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावे लागेल व त्याचे सूतोवाच संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आज उघडपणे सामानातून केले आहे. याआधी देखील, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या जवळीकीबद्दल शरद पवार यांनी वक्तव्य केलं होतं. यांनतर आता संजय राऊत यांनी देखील भाष्य केल्याने, राज्यात आगामी काळात शिवसेना- राष्ट्रवादी अशी नवीन आघाडी उदयास येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
हे पण वाचा, ‘कुठे बाळासाहेबांची शिवसेना, कुठे सत्तेपाई सत्व गमावलेली ही शिवसेना’
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी सातत्याने, काँग्रेस पक्ष आगामी निवडणूका स्वबळावर लढणार असल्याची वक्तव्ये केली जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर, आज सामनामध्ये, ‘सगळेच स्वबळावर लढत असतील, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्र हिताचा विचार करुन एकत्र लढावं लागेल,’ असं सूचक वक्तव्य केलं गेलं आहे. आता यावर राष्टवादीकडून देखील प्रतिसाद दिला गेला असून, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, अप्रत्यक्षपणे राऊतांच्या सुरात सूर मिसळला असल्याचं दिसत आहे.
हे पण वाचा, “शिवसेनेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा…”
‘आघाडीत ३ पक्ष आहेत. तिन्ही पक्षांनी एक राहावं, यालाच सगळ्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे. मात्र, काँग्रेसला स्वबळावर लढण्याची इच्छा असेल, तर इतर दोन पक्ष नक्कीच एकत्र राहतील आणि राज्यातील जनतेचीही तीच इच्छा दिसत आहे,’ असं मत जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिलं आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात तिरंगी लदहत होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
हे पण वाचा, “लपत छपत महिलेवर हात उचलण्यात कसला आलायं पुरूषार्थ? सुभेदाराची सून आठवा आणि तुमचे प्रताप बघा.”
तसेच, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांनी यावर अधिक बोलताना, ‘काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष स्वबळावर निवडणूका लढवायची भाषा करत आहेत. कदाचित सध्या पक्ष वाढवण्यासाठी ते असं म्हणत असतील. शेवटी राज्यात कोणत्या पक्षाचं बळ किती आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे चांगली गोष्ट हीच राहील; की तिघांनी एकत्र येऊन अधिक संघटीत होऊन काम करणं. मात्र, आज जरी काँग्रेस अस म्हणत असेल तरी निवडणुका जवळ आल्यावर ते कदाचित वेगळा आपला विचार बदलतील, मात्र असे जरी झाले नाही तरी समविचारी पक्ष म्हणून इतर पक्ष नक्कीच एकत्र राहतील.
Read Also :
- ‘शिवसेनेने जिथे हिंदुत्व सोडलं तिथंच तर अंतर निर्माण होण्यास सुरुवात झाली’
- पदोन्नतीतील आरक्षण थांबवून, समाजाला वेठीस धरणारे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत?
- ‘आघाडी सरकार आरक्षणविरोधी, मंत्रीच आरक्षणाचा वाद पेटवताहेत’
- भाजपला मोठा धक्का; माजी मंत्र्याची काँग्रेसमध्ये घरवापसी?
- महाराष्ट्राच्या हितासाठी राष्ट्रवादी शिवसेना एकत्र येणार?