मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांवर जोरदार शाब्दिक प्रतिहल्ला केला असून, “झोपेत असताना सरकार कसं आणायचं, हे अजितदादांना चांगलचं माहिती आहे. स्वतः शरद पवार झोपेत असताना त्यांनी राज्यात सरकार आणलं होतं, याचा त्यांना विसर पडला आहे का?,’ असा संतप्त सवाल त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना केला होता.
तसेच, “ज्यांच्या मांडीला मांडी चिकटवून तुम्ही, राज्यात ३ दिवसांचं का होईना; पण सरकार स्थापन केलं होतं. त्यांच्यावरच टीका करताना, जरा तरी विचार करा. अजितदादा सांभाळून बोला! कसं आहे, मी फाटक्या तोंडाचा आहे, बोलायला लागलो तर तुम्हाला खूप महागात पडेल,” अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांना इशारा दिला आहे.
दरम्यान, त्यांच्या या टीकेने राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये संताप वाढत असून, राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
“चंद्रकांत पाटील यांना मस्ती आली आहे. त्यांनी आधी छगन भुजबळ, अशोक चव्हाण यांना आणि आता अजित दादांना तंबी दिली, हे योग्य नाही. आपलं हसं होता काम नये, म्हणून चंद्रकांतदादांनी आतातरी अशी वक्तव्य करणं थांबवलं पाहिजे,” असा टोला त्यांनी चंद्रकांत दादांना लगावला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी, “मी सांगतो की, असेच सगळे झोपेत असतील तेव्हा हे सरकार पडेल आणि कुणाला कळणारच नाही आघाडी सरकार कधी गेलं,” असा दावा केला होता. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, “ज्या दिवसापासून राज्यात आघाडी सरकार आलं आहे, तेव्हापासून भाजप नेत्यांना आपण सरकारमध्ये नाही, ही भावना सतत बोचत आहे, त्यांना असह्य होत आहे,” अशी बोचरी टीका केली होती.
Read Also :
- ‘नव्या भारताचा पाया’ : एकीकडे पुलवामातील शहिदांचा राजकीय वापर; दुसरीकडे गंगेत वाहणारी प्रेतं आणि चितांचा धूर
- ‘निळ्या डोळ्यांच्या मुलासाठी मातोश्रीचं प्रेम इतकं का ऊतू जात आहे?’
- पेट्रोलचा दर पाहून तरुण चक्कर येऊन पडले; पेट्रोल विरोधात नागपूर मध्ये आगळ वेगळं आंदोलन
- आज रात्री ८:३० वा. मुख्यमंत्र्यांचा जनसंवाद; लॉकडाऊनबाबत आज निर्णय
- “नशा दौलत का ऐसा भी क्या के तुझे कुछ भी याद नहीं…”, रुपाली चाकणकरांचा फडणवीसांना टोला