कोल्हापूर : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणा ईडीचा ससेमिरा मागे लागल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या मैदानात लेटरबॉम्ब टाकला आहे. यामुळे आगामी काळात महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ होण्याचे सूतोवाच केले जात असून, त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, शिवसेना कमकुवत करत असल्याचा खळबळजनक दावा केला असून, भाजपसोबत जुळवून घेण्याचा सल्ला, त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
हे पण वाचा, बिलोली- देगलूर पोटनिवडणुकीत भाजप पुन्हा एकदा पंढरपूर पॅटर्न राबविणार
दरम्यान, यावरून आता विविध पक्षातील नेते आपापली प्रतिक्रिया देत असून, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही यावर भाष्य केलं आहे. “आमदार प्रताप सरनाईक आणि परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बमुळे, आघाडी सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही. हे सरकार स्थिर आहे”, असा दावा त्यांनी, सोमवारी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत केला आहे.
हे पण वाचा, प्रशांत किशोर- शरद पवार यांच्यात खलबतं सुरु, राज्यात लवकरच राजकीय वादळ?
यावेळी, सरनाईक यांनी पत्रातून, दोन्ही काँग्रेसकडून शिवसेनेचे पदाधिकारी फोडले जात असल्याचा आरोप केला आहे, यावर बोलताना, “स्थानिक पातळीवर हा प्रकार घडला असेल, मात्र मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते फोडण्याचे प्रकार घडलेले नाहीत. दोन्ही काँग्रेसने, शिवसेनेला मोठ्या मनाने सांभाळून घेतले आहे, ही गोष्ट त्यांनी लक्षात घ्यावी. उलट, काँग्रेस-राष्ट्रवादीच एकमेकांचे कार्यकर्ते फोडत असतात. त्यासाठी आम्हाला फुल्ल परवानगी आहे. मात्र, शिवसेनेला हात लावायचा नाही, हे आमचं ठरलेलं आहे”, असं विधान त्यांनी केलं.
हे पण वाचा, युती होऊ शकते, मात्र आता निर्णय शिवसेनेनं घ्यायचा आहे- गिरीश बापट
तसेच, “प्रताप सरनाईकांचा लेटरबॉम्ब ही सुद्धा एक भाजपची चाल आहे. भाजपकडून हे सुडाचं राजकारण सुरु असून, शिवसेनेचे वाघ असल्या धमक्यांना घाबरणारे नाहीत, असा भाजपवर हल्लाबोल करत, “भाजपला कधी एकदा सत्तेवर येऊ असे झाले आहे. चंद्रकांत पाटील यांच्यातील अस्वस्थता यातूनच व्यक्त झाली आहे,” असं म्हणत त्यांनी चंद्रकांत दादांवर देखील निशाणा साधला आहे.
Read Also :
- खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थित नागपूर येथे असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
- “नवी मुंबई विमानतळाला ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हेच नाव पाहिजे”- राज ठाकरे
- अजित पवारांच्या कार्यक्रमातील गर्दी अंगलट; राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक
- काही नेते ओबीसी, मराठा आणि इतर समाजात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत
- महाविकास आघाडीला ठरवायचं, कोणासोबत युती करायची? का एकमेकांवर चपला फेकायच्या