मुंबई : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने विजय मिळवत महाविकास आघाडीला दणका दिला आहे. भाजप उमेदवार समाधान आवताडे यांचा जवळपास 4 हजार मतांनी विजय झाला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला होता, त्यामुळे पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या पराभवाचे कारण सांगितले असून, दोन तालुक्यांमध्ये संवाद साधण्यात अपयशी ठरल्याने हा पराभव झाल्याचे ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केरळ येथे तीन तर महाराष्ट्र येथे एका जागेवर निवडणूक लढवली होती. केरळात दोन ठिकाणी आम्ही यशस्वी ठरलो तर महाराष्ट्रातील मंगळवेढा-पंढरपूर पोटनिवडणुकीत आम्ही अपयशी ठरलो.@NCPspeaks pic.twitter.com/mG828gSUGp
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) May 2, 2021
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केरळ येथे तीन तर महाराष्ट्र येथे एका जागेवर निवडणूक लढवली होती. केरळात दोन ठिकाणी आम्ही यशस्वी ठरलो तर महाराष्ट्रातील मंगळवेढा-पंढरपूर पोटनिवडणुकीत आम्ही अपयशी ठरलो, असे जयंत पाटील म्हणाले.
‘महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी चांगली मदत केली, मात्र दोन तालुक्यात संवाद साधता न आल्याने आणि दोन तालुक्यांतील सर्वांना सोबत घेऊन जाण्यात आम्हाला अपयश आल्याने आमचा त्या ठिकाणी पराभव झाला’, असे कारण सांगतानाच ‘या निवडणुकीसाठी अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली होती. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे मी आभार व्यक्त करतो’, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.