मुंबई : पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस सुरू असताना जीएसटी, शेतकऱ्यांचे प्रश्न यावरून सत्ताधारी आणि विरोधीपक्षात चांगलेच शाब्दिक वाद पाहायला मिळाले. अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे राज्यातील शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे. या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी विरोधी पक्षाच्यावतीने विधान परिषदेत प्रस्ताव मांडण्यात आला. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी नुकसानग्रस्त जनतेच्या मदतीसाठी राज्य सरकारकडे मदत करावी अशी मागणी केली.
50-50 चलो गुवाहटी..गद्दारांना ताट-वाटी..चलो गुवाहाटी; सलग दुसऱ्या दिवशीही विरोधकांची घोषणाबाजी
शिंदे सरकारने एका दिवसात मेट्रोसाठी आणि ठाण्यातील रस्त्यांसाठी २५ हजार कोटी रुपये मंजूर केले. असेच शेतकऱ्यांसाठी देखील २५ हजार कोटी जाहीर करावेत. केवळ ठाण्यामध्ये खड्डे पडलेले नाहीत, उर्वरीत महाराष्ट्रातही खड्डे पडले आहेत. ठाणे हे मुख्यमंत्र्यांचे घर आहे पण राज्यातील इतर खड्डे कोण बुजवणार, असा खोचक प्रश्न खडसे यांनी विचारला. ज्या धडाडीने हे निर्णय घेतले तीच धडाडी शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतानाही दाखवावी, अशी अपेक्षा एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.
“तुम्ही हजार कोटी घेतलेत, ते घेत असताना तुम्ही नामर्द होते का?” अन् बचू कडू संतापले
राज्यात पावसामुळे व पुरामुळे अनेक भागात अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांची हानी झाली, जनावरे वाहून गेली, वीज पुरवठा बंद पडला अशा अनेक समस्या अजूनही भेडसावत आहेत. मागील दीड महिन्यापासून जनता हवालदिल झाली असताना राज्य सरकारने खातेवाटप झाले नसल्याने सर्व जबाबदारी प्रशासनावर सोपवली. अनेक ठिकाणी मदत अजूनही पुरवली गेलेली नाही. त्यामुळे राज्य सरकार किती दिवसात ही मदत पुरवेल हे जाहीर करावे अशी मागणी खडसे यांनी केली.
“संजय राऊतांच्या संबंधित आणखी 3 ठिकाणी इडीचा छापा”; महत्त्वाची कागदपत्रे जप्त
एनडीआरएफच्या निकषांनुसार मिळणारी मदत अत्यंत तुटपुंजी आहे. महागाई इतकी वाढली आहे की हे निकष बाजूला ठेवून दुप्पट मदत केली तरी ती समाधानकारक नाही. यासाठी राज्य सरकारने महागाई जेवढी वाढली आहे तेवढ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची गरज आहे. पुरामध्ये एखादी व्यक्ती, जनावरे वाहून गेली तर त्यांच्या कुटुंबाला होणाऱ्या मदतीमध्येही वाढ झाली पाहिजे. तसेच दरवर्षी पुराचा वेढा बसणाऱ्या गावांसाठी वेगळा आराखडा तयार करावा, अशीही मागणी खडसे यांनी केली.
“धनंजय मुंडेंची सगळी लफडी माहितीय, त्यामुळे त्याला आम्हाला गद्दार म्हणायचं अधिकार आहे का?”
पावसामुळे पीकांचे नुकसान झालेय, त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर व्हायला हवा. उत्तर महाराष्ट्रात केळीचे मोठे नुकसान झाले आहे. प्रत्यक्ष नुकसान झालेल्या शेतकऱ्याला किचकट प्रक्रियेत ही मदत मिळण्यास विलंब होतो. राज्यात पुरामुळे नुकसान झालेल्या रस्त्यांची तरतूद पूर्वी बजेटमध्ये असायची, अलीकडे ही तरतूद कमी झालेली आहे. राज्यात पहिल्यांदाच सोयाबीन शेतीवर गोगलगायीचे संकट उद्भवले आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. यासाठी शेतकऱ्याला बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्यात यावा तसेच पूर्वीचे कर्जही माफ केले गेले पाहिजे. राज्यात प्रत्येक जिल्ह्यांला लवकरच पालकमंत्री जाहीर करावा, यामुळे शेतकऱ्यांना जलद गतीने मदत मिळेल असही खडसे म्हणाले.
Read also
- “विरोधकांनी पायऱ्यावर गोंधळ करण्यापेक्षा सभागृहात जनतेचे प्रश्न मांडावेत”; धैयशिलराव माने
- “गुलाबराव आपण खाली बसा, इथे तुमचा काय संबंध?”; अन् सभागृहात निलम गोऱ्हे संतापल्या
- “काळी दाढी अन् पांढरी दाढी”; भुजबळांची नरेंद्र मोदी व एकनाथ शिंदेंवर टोलेबाजी
- “आता फक्त भाषणावर जीएसटी लावायची बाकी आहे” ; छगन भुजबळांचा केंद्रावर निशाणा
- “फडणवीसांचा ‘सागर बंगला’ हा वॉशिंग मशीनचं काम करत आहे”