मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केले असून, यावरून राज्यातला ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर नाराज आहे. यातच आता निवडणूक आयोगाकडून धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या ५ जिल्ह्यांतील ३३ पंचायत समित्या आणि ५ जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांवर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला गेला असून, त्यामुळे हा मुद्दा अजूनच चिघळला गेला आहे.
हे पण वाचा, कोरोनाची तिसरी लाट: घाई घाई ने निर्बंध शिथिल करू नका – उद्धव ठाकरे
दरम्यान, यावरून एकीकडे विरोधी पक्ष आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी, विरोधी पक्षाने राज्य सरकारच्या निषेधार्थ, २६ जूनला राज्यव्यापी ‘चक्का जाम’ आंदोलनाची हाक दिली असून, आता ‘जेल भरो’ आंदोलनदेखील भाजपकडून केले जाणार आहे.
हे पण वाचा, “या सरकाराला आव्हान, तुमच्यात दम नसेल; तर आम्हाला सांगा ४ महिन्यात आरक्षण देतो”
तसेच, आजच्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, “हे आरक्षण केवळ या सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलं आहे. या सरकारने मागच्या १५ महिन्यांत मागासवर्गीय आयोगाची स्थापनाच केलेली नाही. आज आमचं राज्य असतं, तर केवळ ४ महिन्यातच ओबीसींचं आरक्षण, आम्ही परत मिळवून दिलं असतं. लक्षात ठेवा, जर ओबीसीला फसवाल तर खबरदार! भाजप शांत बसणार नाही! हे सरकार पळपुटं आहे,” अशी तोफ डागली आहे.
हे पण वाचा, “महाराष्ट्रात जे चाललंय त्याला सरकार म्हणता येईल का?”, फडणवीस ठाकरे सरकारवर गरजले
दुसरीकडे, सत्ताधारी पावसातील नेत्यांनी देखील भाजपवर या मुद्द्यावरून निशाणा साधला असून, राष्ट्रवादीच्या नेत्या आणि जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी, पहिल्यांदाच उघडपणे फडणवीस यांच्यावर टीका केली आहे, तसेच त्यांनी भाजपवर देखील हल्लबोल केला आहे. त्यांनी ट्विट करत, “भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता ? आता गळा काढण्यात अर्थ नाही,” असा टोला लगावला आहे.
भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?. .. आता गळा काढण्यात अर्थ नाही.
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) June 24, 2021
दरम्यान, एकनाथ खडसे भाजपमध्ये असताना त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी पावलोपावली त्रास दिला, क्षणाक्षणाला छळलं, प्रसंगी पक्षातून बाहेर जाण्यासंबंधीचं पाऊल उचलावं लागलं, अशी थेट टीका स्वत: एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडताना केली होती. याचाच संदर्भ घेत रोहिणी खडसे यांनी भाजप आणि फडणवीस यांना लक्ष केले आहे.
Read Also :
- आमची घरे तोडली.., आमच्या माणसांना पोलिस मारतायं.., आम्ही कुठे जायचं..- चिमुकला
- परमबीर सिंग प्रकरणी अजित पवारांचीही सीबीआय चौकशी करा! भाजप कार्यकारिणीत प्रस्ताव मंजूर
- “काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवटपर्यंत टिकला, तर…” जयंत पाटलांचे नवीन आघाडीवर मोठे भाष्य
- बुलढाण्यातील राजकीय समीकरणे लवकरच बदलणार? प्रसेनजीत पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
- बाळासाहेबांचं नाव दिल्याने कामं वेगात पूर्ण होत असतील, तर या प्रकल्पालाही त्यांचंच नाव द्या!